AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदाला देणार घटस्फोट? अखेर सुनिताने सोडलं मौन, म्हणाली “हे खरं..”

अभिनेता गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाच्या 37 वर्षांनंतर हे दोघं विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यावर आता सुनिताने प्रतिक्रिया दिली आहे.

लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदाला देणार घटस्फोट? अखेर सुनिताने सोडलं मौन, म्हणाली हे खरं..
Govinda and SunitaImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 27, 2025 | 12:01 PM
Share

लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा आणि सुनिता अहुजा घटस्फोट घेण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सुनिताने गेल्या काही मुलाखतींमध्ये गोविंदाविषयी जे वक्तव्य केलं होतं, ते पाहून या दोघांमध्ये नक्कीच सर्वकाही आलबेल नसल्याची चाहत्यांना शंका होती. अशातच गोविंदाच्या मॅनेजरने बुधवारी खुलासा केला होता की, सुनिताने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यानंतर गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधाच्याही चर्चा चघळल्या गेल्या. 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर असल्याने सुनिताने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं गेलं. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता सुनिताची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुनिताने तिच्या मॅनेजरमार्फत घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. “हे सर्व खरं नाही” असं तिने म्हटलंय. तर गोविंदाच्या मॅनेजरने याबाबत म्हटलंय की, “त्या दोघांमध्ये आता सर्वकाही ठीक आहे. पती-पत्नीच्या नात्यात अशा गोष्टी होत असतात. त्यांचं नातं मजबूत आहे. दोघं वेगवेगळे राहत असल्याच्या चर्चांवर बोलायचं झाल्यास, मी हे स्पष्ट करू इच्छितो की खासदार झाल्यानंतर गोविंदाने ऑफिशियल कामांसाठी बंगला खरेदी केला होता. गोविंदा तिथेच सर्व मिटींग्स घेतो. काम अधिक असल्यास आणि उशीर झाल्यास तो त्याच बंगल्यात झोपतो. मात्र याचा अर्थ असा नाही की तो त्याच्या कुटुंबीयांसोबत नाही.”

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

काही दिवसांपूर्वी सुनिताने एका मुलाखतीत सांगितलं होतं की ती आणि गोविंदा वेगळे राहत आहेत. मात्र नंतर तिने स्पष्ट केलं की कोणीही त्यांना वेगळं करू शकत नाही. सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा पसरल्यानंतर गोविंदाने अखेर ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यावर मौन सोडलं. तो म्हणाला, “मी सध्या माझ्या आगामी चित्रपटाच्या कामात खूप व्यस्त आहे.” गोविंदाने घटस्फोटाबाबत थेट काही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळे या दोघांच्या नात्यात नक्कीच काही समस्या सुरू असल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याच्या आधीपासूनच गोविंदा आणि सुनिता एकमेकांसोबत आहेत. सुनिताच्या वडिलांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. म्हणून ते मुलीच्या लग्नालाही उपस्थित नव्हते. गोविंदाने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर सुनिताशी गुपचूप लग्न केलं होतं. या दोघांना जेव्हा मुलगी झाली, तेव्हा लग्नाबद्दल सर्वांना माहीत झालं होतं.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.