AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माधुरी दीक्षितचं स्थळ आलं, पण…सुरेश वाडकर यांनी सांगितलं त्या अधुऱ्या लग्नाची गोष्ट; काय घडलं होतं?

गायक सुरेश वाडकर यांनी अखेर त्या जुन्या अफवेवर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये असे म्हटले जात होते की त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितला 'ती खूप सडपातळ (बारीक)' असल्याच्या कारणावरून लग्नाला नकार दिला होता.

माधुरी दीक्षितचं स्थळ आलं, पण...सुरेश वाडकर यांनी सांगितलं त्या अधुऱ्या लग्नाची गोष्ट; काय घडलं होतं?
Suresh Wadkar and madhuriImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 08, 2026 | 6:58 PM
Share

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. एकेकाळी माधुरीची इतकी क्रेझ होती की तिच्या मागे तरुण दिवाने होते. पण माधुरीच्या कुटुंबियांनी डॉ. श्रीराम नेने यांच्याशी माधुरीचे लग्न लावण्याआधी तिचे स्थळ सुरेश वाडकर यांच्यासाठी पाठवले होते. पण सुरेश वाडकर यांनी माधुरी खूप बारीक असल्यामुळे नकार दिल्याच्या चर्चा रंगल्या. आता कित्येक वर्षांनंतर सुरेश वाडकर यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘द लल्लनटॉप’ (The Lallantop) ला दिलेल्या एका मुलाखतीत या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना वाडकर म्हणाले, “अरे देवा, ती माधुरीवाली अफवा! माधुरी तर एखाद्या दिवशी माझ्या डोक्यावर जे थोडेफार नैसर्गिक केस उरलेत, तेही ओढून काढेल. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. इंडस्ट्रीतील सहकारी आहे आणि मला ती खूप आवडते.”

अर्चना पुरण सिंग यांच्यावर मिश्किल आरोप

या अफवेचे खापर मिश्किलपणे अर्चना पुरण सिंग यांच्यावर फोडत सुरेश वाडकर पुढे म्हणाले, “हा सगळा खोडसाळपणा अर्चना पुरण सिंगचा आहे. ती माझ्या बहिणीसारखी आहे आणि माझ्यावर खूप प्रेम करते. माहिती नाही तिने हे कुठून ऐकले आणि थेट टीव्हीवर बोलून दिले. तेव्हापासून माझ्या जेवढ्या मुलाखती होतात, त्या सर्वांमध्ये मला हमखास हाच प्रश्न विचारला जातो.”

माधुरीशी कधी यावर चर्चा झाली का?

याच मुलाखतीदरम्यान वाडकर यांना विचारण्यात आले की, त्यांनी कधी या अफवेबद्दल माधुरी दीक्षितशी चर्चा केली आहे का? त्यावर खुलासा करताना ते म्हणाले, “असे होऊ शकते की त्या काळात असा एखादा किस्सा घडला असेल. कदाचित तिच्या वडिलांकडून काही विचारणा झाली असेल. पण लोक असे लिहितात की, ती खूप बारीक असल्यामुळे सुरेश वाडकरांनी तिला नकार दिला होता.”

गायक पुढे म्हणाले, “ती बारीक तर होतीच. जर तुम्ही ‘अबोध’ चित्रपट पाहिलात, तर त्यात ती अगदी तशीच बारीक होती. पण लग्नाची मागणी माझ्यापर्यंत पोहोचलीच नव्हती, तर मग मी नकार कसा देणार? आणि तोपर्यंत पद्मा (त्यांची पत्नी) माझ्या आयुष्यात आली होती. पद्मा माझी विद्यार्थिनी राहिली आहे.”

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?