AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपूर घराण्याची न झालेली सून, आता सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाला करतेय डेट?

ही अभिनेत्री कपूर घराण्यातील एका सदस्याला डेट करत होती. परंतु ब्रेकअप झाल्यानंतर त्याने तिच्याच मैत्रीणीशी लग्न केलं. आता या अभिनेत्रीचं नाव सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाशी जोडलं जातंय. गेल्या दोन महिन्यांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं कळतंय.

कपूर घराण्याची न झालेली सून, आता सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाला करतेय डेट?
वीर पहारिया, तारा सुतारियाImage Credit source: Instagram
| Updated on: May 29, 2025 | 11:03 AM
Share

कपूर घराण्यात काही महिन्यांपूर्वीच सनईचौघडे वाजले होते. राज कपूर यांची मुलगी रीमा जैनचा मुलगा आदर जैनने बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याला संपूर्ण कपूर कुटुंबीय उपस्थित होते. बालमैत्रीण आलेखा अडवाणीशी लग्न करण्यापूर्वी आदर हा अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. तारा आणि आदर हे एकमेकांशी लग्न करणार, तारा कपूर कुटुंबाची सून होणार अशा जोरदार चर्चा होत्या. परंतु काही कारणास्तव दोघांच्या नात्यात कटुता निर्माण झाली. त्यानंतर आता तारा सुतारियाच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एण्ट्री झाल्याचं कळतंय. गेल्या दोन महिन्यांपासून ती एका नवोदित अभिनेत्याला डेट करतेय. हा नवोदित अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडियाला डेट करतेय.

वीर पहाडियाने ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. तर तारा सुतारिया ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’मधून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. बॉलिवूड पदार्पण करण्यापूर्वीच वीर त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत होता. अभिनेत्री सारा अली खानला तो डेट करत असल्याचं म्हटलं गेलं होतं. विशेष म्हणजे ‘स्काय फोर्स’ या पहिल्याच चित्रपटात त्याने सारासोबत काम केलंय. परंतु सारा आणि वीरचंही नातं फार काळ टिकू शकलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार तारा आणि वीर यांच्यात काही महिन्यांपूर्वीच चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात होतंय. हे दोघं एकमेकांना ओळखण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघं काही वेळा एकमेकांसोबत डेटला गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच तारा आणि वीरला एका रेस्टॉरंटमध्ये पाहिलं गेलं होतं. डिनरनंतर तारा तिच्या काही मैत्रिणींसोबत बाहेर पडली आणि थोड्या वेळाने वीरसुद्धा तिथून निघाला. याआधी लॅक्मे फॅशन वीकमध्ये तारा आणि वीरने एकत्र रॅम्पवॉक केला होता.

तारा आणि आदर यांचं 2023 मध्ये ब्रेकअप झालं. त्यानंतर आदरने ताराचीच मैत्रीण आलेखा अडवाणीशी यावर्षी लग्न केलं. या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. मेहंदीच्या कार्यक्रमात दिलेल्या भाषणात आदरने अप्रत्यक्षपणे एक्स गर्लफ्रेंडचा उल्लेख केल्याचं म्हटलं गेलं होतं. “आजपर्यंत मी फक्त टाइमपास केला, पण तुझ्यावर मी खरं प्रेम करतो”, असं तो होणारी पत्नी आलेखाला उद्देशून म्हणत होता. परंतु आदरने हा टोमणा ताराला मारल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. यावरून अनेकांनी त्याला ट्रोलसुद्धा केलं होतं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.