AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कधी कधी बाहेर पडावं..’; अचानक मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री तेजश्री प्रधान ही स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारत होती. मात्र अचानक तिने ही मालिका सोडली आहे. त्यानंतर आता तिची सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत आली आहे.

'कधी कधी बाहेर पडावं..'; अचानक मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत
tejashri pradhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 08, 2025 | 12:41 PM
Share

अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. यामध्ये तिने साकारलेली मुक्ताची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. मात्र आता अचानक तिने या मालिकेला रामराम केला आहे. या मालिकेत आता तेजश्रीच्या जागी दुसरी अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्रीने अचानक ही मालिका का सोडली, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात असतानाच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेल्या तेजश्रीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने जे लिहिलंय, त्यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

साडीमधील सुंदर फोटो पोस्ट करत तेजश्रीच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘चिअर्स.. कधीकधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्त्वाचा आदर करा. कारण तुमच्यासाठी ते इतर कोणीही करणार नाही.’ या कॅप्शनच्या हॅशटॅगमध्ये तिने लिहिलंय, ‘तुम्ही ज्याचे पात्र आहात त्यापेक्षा कमी गोष्टींसाठी अजिबात तडजोड करू नका’, ‘तुम्ही महत्त्वाचे आहात’, ‘देवाकडे तुमच्यासाठी नेहमीच प्लॅन तयार असतो’, ‘हॅपी लाइफ’. मालिकेतून बाहेर पडल्यानंतर तेजश्रीने ही पोस्ट लिहिल्याने त्यावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

तेजश्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘प्लीज प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडू नकोस. तुम्हा दोघांसाठी फक्त आम्ही ही मालिका बघत होतो. दुसऱ्या कोणाला सागरसोबत मुक्ता म्हणून पाहू शकत नाही. आम्ही प्रेक्षक मनापासून तुमचं काम पाहतो, तुमच्यावर प्रेम करतो. त्यांचा विचार तुम्ही केला पाहिजे’, असं एकाने लिहिलंय. तर ‘प्रेमाची गोष्ट या मालिकेची कथा आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. तुम्ही त्यातून बाहेर पडल्याचा निर्णय योग्यच घेतला’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘पण का’, असा सवालही काही नेटकऱ्यांनी तेजश्रीला केला आहे.

तेजश्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून बऱ्याच वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक केलं होतं. ही मालिका सुरळीत सुरू होती. त्याचवेळी तेजश्री ‘तदेव लग्नम’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकेचं शूटिंग आणि चित्रपटाचं प्रमोशन या सर्व गोष्टी ती करत होती. मात्र अचानक तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.