AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील अभिनेत्याच्या मुलाचं निधन

19 वर्षीय मुलाच्या निधनाने कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

'भाभी जी घर पर है' मालिकेतील अभिनेत्याच्या मुलाचं निधन
Jeetu GuptaImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 28, 2022 | 7:44 PM
Share

मुंबई- टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘भाभी जी घर पर है’ (Bhabhi Ji Ghar Par Hai) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते जीतू गुप्ता (Jeetu Gupta) यांच्या मुलाचं निधन झालंय. जीतू यांच्या मुलाचं नाव आयुष होतं. तो 19 वर्षांचा होता. आपल्या मुलाच्या निधनाने जीतू यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जीतू यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर आपल्या मुलाचा फोटो पोस्ट करत त्याच्या निधनाची माहिती दिली. हीच पोस्ट कॉमेडियन सुनील पाल यांनीसुद्धा शेअर केली आहे.

आयुषचा फोटो शेअर करत सुनील पाल यांनी लिहिलं, ‘त्याच्या आत्म्याला शांती लाभो. भाभी जी घर पर है या मालिकेतील अभिनेते, माझा भाऊ जीतू यांचा मुलगा आयुष (19 वर्षे) आता आपल्यात नाही.’

जीतूने एक दिवस आधी रुग्णालयातील मुलाचा पोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये आयुष रुग्णालयातील बेडवर होता. त्याची प्रकृती गंभीर आहे आणि तो कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाही, असं जीतून यांनी लिहिलं होतं.

‘मुलगा आयुषबद्दलची पोस्ट वाचल्यानंतर मला अनेकांनी कॉल्स आणि मेसेज केले. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा. त्याची प्रकृती गंभीर आहे. मी सध्या कोणाशीच बोलण्याच्या मनस्थितीत नाही’, असंही त्यांनी लिहिलं होतं.

जीतूने भाभी जी घर पर है या मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारली आहे. या मालिकेमुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. ‘ही मालिका माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट आहे,’ असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.

Follow Us
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.