AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19 : त्याची लायकीच नाही… संतापलेल्या अभिनेत्रीने बिग बॉस विजेत्या गौरवची इज्जतच काढली, काय काय म्हणाली?

बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले गौरव खन्नाने जिंकला, तर फरहाना भट्ट टॉप 2 मध्ये होती. विजयानंतर फरहानाने तिचे स्पष्ट मत व्यक्त केले. तिने म्हटले की, ट्रॉफी न मिळाल्याने वाईट वाटले नाही, कारण प्रेक्षकांचे प्रेम हे ट्रॉफीपेक्षा मोठे आहे.

Bigg Boss 19 : त्याची लायकीच नाही… संतापलेल्या अभिनेत्रीने बिग बॉस विजेत्या गौरवची इज्जतच काढली, काय काय म्हणाली?
Gaurav Khanna
| Updated on: Dec 08, 2025 | 9:37 AM
Share

टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत आणि वादग्रस्त शो पैकी एक अशी ओळख असलेला बिग बॉसच्या 19 व्या पर्वाचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. यंदाच्या बिग बॉसच्या 19 व्या पर्वाचे विजेतेपद प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना याने पटकावलं आहे. टॉप 5 मध्ये गौरवसोबत फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल पोहोचले होते. मात्र शेवटच्या दहा मिनिटांत गौरवला सर्वाधिक मतं मिळाली आणि तो या पर्वाचा विजेता ठरला. गौरवला बक्षिस म्हणून बिग बॉस 19 ची ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. गौरवच्या या विजयानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

बिग बॉसच्या घरात आपल्या दमदार व्यक्तिमत्वामुळे आणि स्पष्ट बोलण्यामुळे प्रेक्षकांची मने जिंकणारी फरहाना भट्टने टॉप-2 मध्ये तिचे स्थान निश्चित केले होते. तिला बिग बॉसची ट्रॉफी जिंकता आली नसली तरी तिला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले. आता नुकतंच टीव्ही ९ हिंदीच्या डिजीटल टीमने फरहानासोबत खास गप्पा मारल्या. यावेळी तिने तिच्या बिग बॉसच्या प्रवासावर, घरातल्या इतर स्पर्धकांबद्दल आणि आता ती पुढे काय करणार आहे, याबद्दल भाष्य केले.

शोमध्ये ट्रॉफीपेक्षाही जास्त काहीतरी कमावलं

यावेळी तिला तुला ट्रॉफीच्या इतक्या जवळ पोहोचूनही ट्रॉफी जिंकता आली नाही आणि गौरव विनर झाला तेव्हा वाईट वाटलं का? असा प्रश्न फरहानाला विचारण्यात आला. त्यावर तिने हो मला थोडीशी आशा होती की ट्रॉफी आपल्याला मिळेल, पण खरं सांगायचं तर मला अजिबात वाईट वाटलं नाही. कारण मी हरु देखील शकते, असेही माझ्या मनात आले होते. पण माझ्याकडे आता लोकांचं भरभरून प्रेम आणि पाठिंबा आहे. मी शोमध्ये ट्रॉफीपेक्षाही जास्त काहीतरी कमावलं आहे. लोक या सीझनला फरहाना भट्टचा सीझन म्हणत आहेत. माझ्या आईनेही मला हेच सांगितलं. माझ्यासाठी हेच खूप आहे, असे फरहाना भट्ट म्हणाली.

विजेता होण्याच्या योग्यतेचा नाही आणि कधीही नव्हता

यानंतर तिने गौरव खन्नाच्या विजेतेपदावर भाष्य केले. माझ्या मते गौरव खन्नाचं या शोमध्ये कोणतंही योगदान नाही. प्रेक्षक हा शो कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहेत, हे मला माहीत नाही, पण माझ्या मते त्याचे यात काहीही योगदान नाही. त्याने प्रत्येकवेळी खूप सेफ गेम खेळला. त्याने कधीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्याने आपल्या वागणुकीने लोकांना कमी लेखलं. त्याने अशा बऱ्याच गोष्टी केल्या आहेत, ज्या मी संपूर्ण शोमध्ये वेळोवेळी उघड केल्या. त्यामुळे मला वाटत नाही की तो विजेता होण्याच्या योग्यतेचा नाही आणि कधीही नव्हता, असं मला आजही वाटतं, असेही फरहानाने म्हटले.

Follow Us
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....