AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Sharma | कपिल शर्माच्या मुलाचं नाव ऐकलंत का? ‘या’ नावाचा ‘विजया’शी आहे खास संबंध!

प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ (Ginni Chatrath) फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. गिन्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Kapil Sharma | कपिल शर्माच्या मुलाचं नाव ऐकलंत का? ‘या’ नावाचा ‘विजया’शी आहे खास संबंध!
परिवारासमवेत कपिल शर्मा
| Updated on: Apr 05, 2021 | 11:17 AM
Share

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ (Ginni Chatrath) फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. गिन्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. दोघांनाही आधी एका एक मुलगी आहे. जेचे नाव ‘अमायारा’ आहे. मात्र, अद्याप कपिलने मुलाचे नाव व फोटो जाहीर केले नव्हते. पण, आता अखेर कपिलने मुलाचे नाव जाहीर केले आहे. वास्तविक, गायिका नीती मोहनने (Niti Mohan) कपिलच्या वाढदिवशी त्याला शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली होती आणि यावेळी तिने मुलाचे नावही विचारले होते (Comedian Kapil Sharma revels his baby boy name trishaan).

नीती मोहनने ट्विट केले होते की, ‘हॅपी बर्थडे कपिल पाजी. तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप प्रेम. आता तरी बाळाचे नाव सांग!’ कपिलने नितीच्या या ट्विटला उत्तर देताना लिहिले, ‘धन्यवाद नीतू, आशा आहे की, आपण स्वतःची काळजी घेत आहात. आम्ही मुलाचे नाव ‘त्रिशान’ असे ठेवले आहे.’ या नावाचा खास अर्थ आहे. त्रिशान म्हणजे विजय, यश. खरोखरच कपिलने आपल्या मुलाचे नाव खूपच विचार करून ठेवले आहे.

पाहा कपिलची पोस्ट

कपिल पुन्हा येणार चाहत्यांच्या भेटीला!

कपिल शर्माचा शो गेल्या महिन्यात ऑफ एअर झाला होता. तथापि, आता हा शो कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. हा शो नवीन कलाकार व नव्या टीमसह परत येणार आहे. हा शो नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसोबत चित्रित व्हावा, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. पण वाढत्या कोरोनाच्या उद्रेकामुळे प्रेक्षकांसह हा शो सुरू करण्यात बरीच अडचणींना सामोरे जावे लागू शकते, म्हणूनच टीम तयार झाली तरी दोन महिन्यांआधी हा शो टीव्हीवर परत आणणे शक्य नाही (Comedian Kapil Sharma revels his baby boy name trishaan).

नवं टॅलेंट, नवे कलाकार जोडले जाणार

द कपिल शर्मा शो मध्ये नवं टॅलेंट, नवे कलाकार आणि नवे स्क्रिप्ट रायटर्सचं स्वागत करण्यासाठी मी उत्साहीत आणि आनंदी आहे. एन्टरटेन्मेंटसाठी खरी इच्छा दाखवणारे आणि समान विचारधारा असलेले टॅलेंटेड लोकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे, असं कपिल शर्माने म्हटलं होतं. कपिल शर्मा शोचं प्रॉडक्शन सलमान खान टेलीव्हिजन आणि Banijay Asia कडून केलं जातं.

सलमान खान टेलीव्हिजनचे सीईओ नदीम कोरीशी यांनी सांगितलं की, ‘कपिल शर्मा आणि त्यांच्या शोचे अन्य कलाकार देशभरात या शोमुळे ओळखले जातात. आम्ही प्रेक्षकांना काही नावीन्यपूर्ण आणि रोमांचक देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. टीमचे आताचे आणि नव्याने जोडले जाणाऱ्या सर्व लोकांचा उद्देश्य हा फक्त मनोरंजन असणार आहे’.

नव्या दमाने परत येऊ!

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री भारती सिंहने एका मुलाखतीत या शोबद्दल सांगितले होते की, ‘हो, आम्ही ब्रेकवर आहोत पण काहीतरी नवीन करण्यासाठी! आम्ही ब्रेक घेत आहोत जेणेकरून आम्ही स्वतःस अपग्रेड करू शकू. नवीन पात्रांवर काम करण्यासाठी आमची टीम उत्साहित आहे. येत्या दोन महिन्यांत केवळ एखादाच चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चॅनेलने शोला पुन्हा ब्रेक देण्याचे ठरवले आहे. मात्र, असे नाही की या दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीच्या वेळी आम्ही पूर्णपणे सुट्टीवर जाऊ. या काळात आम्ही एक टीम म्हणून नवीन पात्रांवर काम करू आणि अधिक जोमाने परत येऊ. प्रामाणिकपणे, आम्ही सर्व यासाठी उत्साही आहोत.’

(Comedian Kapil Sharma revels his baby boy name trishaan)

हेही वाचा :

Akshay Kumar | कोरोनाची लागण झालेल्या ‘खिलाडी’ कुमारची तब्येत खालवली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल!

Star Pravah Parivaar | स्टार प्रवाह परिवारमध्ये अरुंधती, माऊ, जयदीप सर्वोत्तम; विजेत्यांची संपूर्ण यादी

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.