AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khoya Khoya Chand : ‘दिया और बाती हम’ मालिकेतून अनस रशीदला मिळाली खास ओळख, आता इंडस्ट्रीपासून लांब राहून करतोय ‘हे’ काम

टीव्ही अभिनेता अनस रशीदनं 'दिया औंर बाती हम' मालिकेद्वारे घराघरात नाव कमावलं. मात्र आता तो इंडस्ट्रीपासून लांब आहे. (Khoya Khoya Chand: Anas Rashid got special recognition from 'Diya Aur Bati Hum' serial, now he is working away from the industry)

Khoya Khoya Chand : 'दिया और बाती हम' मालिकेतून अनस रशीदला मिळाली खास ओळख, आता इंडस्ट्रीपासून लांब राहून करतोय 'हे' काम
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 8:23 AM
Share

मुंबई : सुपरस्टार बनण्याचे स्वप्न घेऊन हजारो लोक मुंबईत येतात. अनेकांचं हे स्वप्न खूप लवकर पूर्ण होतं, तर काहींना दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर यश मिळतं. आज आम्ही तुम्हाला आमच्या खास सेगमेंट ‘खोया खोया चाँद‘ (Khoya Khoya Chand) मध्ये टीव्ही अभिनेता अनस रशीद (Anas Rashid) बद्दल सांगणार आहोत. ज्यानं ‘दिया औंर बाती हम’ मालिकेद्वारे घराघरात नाव कमावलं. मात्र आता त्यानं इंडस्ट्री अलविदा म्हटलं आहे.

अनस नेहमीच त्याच्या निरागसतेसाठी ओळखला जातो. त्यानं 2004 मध्ये मिस्टर पंजाब हा अवॉर्ड जिंकून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मिस्टर पंजाब हा अवॉर्ड जिंकल्यानंतर त्यानं टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला.

‘कहीं तो होगा’च्या माध्यमातून पदार्पण

मिस्टर पंजाब जिंकल्यानंतर अनसनं आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 2007 मध्ये कहीं तो होगा या मालिकेद्वारे केली. या शोमध्ये त्यानं कार्तिक अहलुवालियाची भूमिका साकारली होती. यानंतर त्यानं क्या होगा निम्मो का, ऐसे करो ना वादा, पृथ्वीराज या सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. अनसनं ‘दिया औंर बाती हम’ या मालिकेतही काम केलं. या मालिकेत अनसनं सूरज राठीची भूमिका साकारली होती. या शोमुळे त्याला घराघरात स्वत:ची वेगळी ओळख मिळाली.

14 वर्षांनी लहान असलेल्या हिनाशी केलं लग्न

अनसनं 2017 मध्ये त्याच्यापेक्षा 14 वर्ष लहान हिना इकबालशी लग्न केलं. दोघांनी लुधियानामध्ये लग्न केलं होतं. अनसनं हिनाला लग्नाबद्दल विचारलं असता तिनं सांगितले की वयामुळे तिला काही फरक पडत नाही.

इंडस्ट्रीपासून लांब राहून करतोय शेती

टीव्ही इंडस्ट्रीला निरोप देऊन अनस आपल्या गावी मालेरकोटला गेला आहे. त्याला इंडस्ट्रीमधून ब्रेक घेऊन 5 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की आता तो शेतकरी झाला आहे आणि त्याला शेतीत आनंद मिळतोय.

संबंधित बातम्या

रामू जेव्हा जॅकीच्या भूमिकेत शिरतो तेव्हा ‘रंगिला’ बनतो, खासगी व्हिडीओ वेगानं व्हायरल

Nysa : न्यासाचा एक सिक्रेट बॉयफ्रेंड असं कळलं तर?, काजोल म्हणाली ‘अजयला कळलं तर तो गेटवर बंदूक घेऊन उभा राहील’

Tiger 3 : ‘टायगर 3’च्या सेटवरून सलमान खानचा फर्स्ट लूक लीक, लांब केस आणि दाढीमध्ये भाईजानला ओळखणं कठीण

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...