AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे काय घडले की, अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाले?

नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिषेक बच्चन अगोदर कौन बनेगा करोडपतीमध्ये हजेरी लावतात.

असे काय घडले की, अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाले?
| Updated on: Oct 06, 2022 | 10:57 AM
Share

मुंबई : कौन बनेगा करोडपतीच्या (Kaun Banega Crorepati) सीजनची दणक्यात सुरूवात झालीये. बिग बी अर्थात अमिताभ बच्चन या सीजनला होस्ट करत आहेत. कौन बनेगा करोडपतीचा 11 ऑक्टोबरचा एपिसोड खास ठरणार आहे. या एपिसोडलामध्ये (Episode) अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन हजेरी लावणार आहेत. यादरम्यान बिग बी भावूक होताना दिसणार आहेत. इतकेच नाही तर जया बच्चन यावेळी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे अनेक राज खुले करणार आहेत. यामुळेच हा एपिसोड धमाकेदार ठरणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिषेक बच्चन अगोदर कौन बनेगा करोडपतीमध्ये हजेरी लावतो. त्यानंतर अचानक जया बच्चन येतात, जया बच्चन यांना पाहून अमिताभ बच्चन भावूक होतात. त्यानंतर अमिताभ बच्चन जया बच्चनजवळ जातात आणि त्यांची गळाभेट घेतात. परंतू यादरम्यान अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर झाले. 11 ऑक्टोबरचा एपिसोड खास असणार आहे. कारण यादिवशी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे.

अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपतीमधील हा प्रोमो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. हा प्रोमो सोनी लिव्हच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलाय. जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या एपिसोडमध्ये नेमकी काय मस्ती करतात हे बघण्यासारखे ठरणार आहे. मात्र, यासाठी प्रेक्षकांना 11 तारखेची वाट पाहावी लागणार आहे.

Follow Us
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.