AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन धर्मांमध्ये विभागलेल्या शहराची कहाणी; ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलरची चर्चा

'द काश्मीर फाइल्स'नंतर आता 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दोन धर्मांमध्ये विभागलेल्या शहराची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दोन धर्मांमध्ये विभागलेल्या शहराची कहाणी; 'द बंगाल फाइल्स'च्या ट्रेलरची चर्चा
द बंगाल फाइल्सImage Credit source: Youtube
| Updated on: Aug 17, 2025 | 12:24 PM
Share

‘द काश्मीर फाइल्स’नंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. आधी या चित्रपटाचं नाव ‘द दिल्ली फाइल्स’ असं ठेवलं होतं, नंतर ते बदलून ‘द बंगाल फाइल्स’ असं करण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये हिंदू-मुस्लीम यांच्यातील दंगल आणि मन विचलित करणारी अनेक दृश्ये पहायला मिळतात.

‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका मुस्लीम आमदाराच्या कुटुंबाच्या डिनरच्या दृश्याने होते. जेवणाच्या टेबलावर बसलेला आमदार त्याच्या मुलाशी बोलतो, “जर 2050 मध्ये तू अल्पसंख्याक गटातून पहिला पंतप्रधान झालास तर काय होईल?” यानंतरची कथा जुन्या काळातील आहे. बंगालमध्ये दोन संविधानांचं पालन केलं जातं, हे राज्य दोन भागात विभागलं गेलं आहे- एक हिंदूंचा आणि दुसरा मुस्लिमांचा, असा संवाद पुढे ऐकायला मिळतो. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना यांच्यात बंगालबद्दल चर्चा होते. जिना बंगालचा एक भाग मिळवू इच्छितात. यामुळे शहरात दंगली होतात. हिंदू आणि मुस्लीम समाज एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात आणि सर्वत्र हिंसाचार, द्वेष पसरतो. या ट्रेलरमध्ये मन विचलित करणारी अनेक दृश्ये पहायला मिळतात.

पहा ट्रेलर-

एकीकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत लोक मारले जातात, त्याचवेळी हिंदू समाज याचा बदला घेण्यासाठी लोकांना मारताना दिसून येतात. यादरम्यान बंगालचं विभाजन करण्यास स्पष्टपणे नकार दिला जातो. या घडामोडींची झलक दाखवल्यानंतर हा ट्रेलर आजच्या काळाकडे येतो. अभिनेता दर्शन कुमारचं पात्र या ट्रेलरमध्ये सवाल करतो की, ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का? जर आपण खरंच स्वतंत्र आहोत तर मग इतके असहाय्य का आहोत? देशाच्या स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आपण अशा सामाजिक समस्यांना का तोंड देत आहोत?’

जर काश्मीरच्या कथेनं तुम्हाला दु:ख दिलं असेल तर बंगालची कहाणी तुम्हाला घाबरवेल. हा चित्रपट येत्या 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील बऱ्याच कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. अनुपम खेर, पल्लवी जोशी, सिमरत कौर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांसारख्या कलाकारांनी यामध्ये काम केलंय.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक