AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरपुड्याची गोड बातमी दिली, तर ट्रोलर्स म्हणाले, ‘माझी मुलं ISIS मध्ये भरती होतील’, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री प्रियामणी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आंतरधर्मीय लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मुस्तफा राजशी साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

साखरपुड्याची गोड बातमी दिली, तर ट्रोलर्स म्हणाले, 'माझी मुलं ISIS मध्ये भरती होतील', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Priyamani and Mustafa RajImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 27, 2025 | 11:52 AM
Share

‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून हिंदी कलाविश्वात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियामणीने 2017 मध्ये लग्न केलं. इव्हेंट मॅनेजर आणि दिग्दर्शक मुस्तफा राज याच्याशी तिने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. मात्र या लग्नानंतर दोघांनाही प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. प्रियामणीने मुस्तफाशी आंतरधर्मीय लग्न केल्याने नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत. आता लग्नाच्या सात वर्षांनंतरही द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागत असल्याची तक्रार तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलून दाखवली.

याविषयी ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियामणी म्हणाली, “माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदी क्षण मला माझ्या लोकांसोबत शेअर करायचा होता. म्हणून मी साखरपुड्याची गोड बातमी सर्वांना सांगितली. पण कोणत्या कारणासाठी माहीत नाही, माझ्यावर लोकांनी टीका करण्यास सुरुवात केली. लव्ह जिहादचे आरोप आमच्यावर झाले. इतकंच नव्हे तर जेव्हा आमची मुलं होतील, तेव्हा ते ISIS या दहशतवादी संघटनेत सामील होतील, अशीही टीका लोकांनी केली”

View this post on Instagram

A post shared by Priya Mani Raj (@pillumani)

अशा कमेंट्सचा प्रियामणीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. “मी फिल्म इंडस्ट्रीचा भाग असल्याने तुम्ही मला काहीही बोलू शकता हे मी समजू शकते. पण अशा व्यक्तीवर का आरोप करावेत, जो या सगळ्याचा भागच नाहीये? तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काहीच माहीत नाही. या कमेंट्समुळे दोन-तीन दिवस माझ्यावर खूप परिणाम झाला होता, कारण मला सतत मेसेज येत होते. आजही मी एखादी पोस्ट केली, तर दहापैकी नऊ कमेंट्स हे आमच्या धर्माविषयी किंवा जातीविषयी असतात”, अशी खंत तिने बोलून दाखवली.

“आगीत तेल ओतल्याने कोणाचंच भलं होत नाही, ही गोष्ट मला समजू लागली आहे. मला ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला मला कोणतंच महत्त्वं द्यायचं नाहीये किंवा त्यांना मिळणाऱ्या एक मिनिटाच्या प्रसिद्धीला एंजॉय करू दे. हे असे लोक असतात ते कम्प्युटर किंवा फोनमागे चेहरा लपवून अशी एखादी कमेंट करतात आणि त्यावर आम्ही उत्तर द्यावं अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे अशा नकारात्मकतेला मी दुर्लक्ष करायला शिकलेय”, असं प्रियामणी म्हणाली.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.