AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

400 वर्षांपूर्वीचे हे भजन, री-क्रिएट होताच बनलं अमिताभ यांचं सर्वात लोकप्रिय गाणं, तुम्ही ऐकलंय का ?

400 वर्षांपूर्वीचं एक भजन, कित्येक वर्षांनी त्याचा आवाज बॉलिवूडपर्यंत पोहोचला. पण अमिताभ यांच्यावर ते गाण चित्रित होताच अतिशय हिट झालं, त्यामागची कहाणी ऐकून अनेक लोकं आजही हैराण होतात.

400 वर्षांपूर्वीचे हे भजन, री-क्रिएट होताच बनलं अमिताभ यांचं सर्वात लोकप्रिय गाणं, तुम्ही ऐकलंय का ?
| Updated on: Sep 01, 2026 | 9:39 PM
Share

जेव्हा जेव्हा कृष्णभक्तीच्या गीतांचा विषय निघतो, तेव्हा मीराबाईंच्या भजनांचा उल्लेख आवर्जून केला जातो. श्रीकृष्णाविषयी त्यांची भक्ती आणि समर्पण आजही लोकांना भावूक करतं. मीराबाईंनी आपलं आराध्य असलेल्या श्रीकृष्णाला समर्पित अनेक भजनं रचली, जी शेकडो वर्षांनंतरही भक्तांच्या ओठांवर असतात, अनेक जण ती म्हणतात देखील. यापैकीच एक प्रसिद्ध भजन म्हणजे ‘पग घुंघरू बांध मीरा नाची रे’. सुमारे 400 वर्षं जुनं असलेल्या या भजनात मीराबाईंची श्रीकृष्णावरील मोठी भक्ती दिसून येते, ज्यामध्ये त्यांना जगाची कोणतीही पर्वा नाही. या भजनाच्या शब्दांत प्रेम, भक्ती, समर्पण आणि समाजाची पर्वा न करण्याची भावना स्पष्टपणे दिसते.

भजनात लपलाय मोठा भाव

‘पग घुंघरू बांध मीरा नाची रे’ हे भजन मीराबाईंच्या कृष्णभक्तीशी निगडीत आहे. भजनाच्या सुरुवातीच्या ओळींमध्ये मीरा आपल्या पायात घुंगरू बांधून श्रीकृष्णाच्या प्रेमा नाचण्याचा उल्लेख करते. त्यांच्यासाठी कृष्ण हा फक्त देव नाही तर, तर ते त्यांचे प्रियतम आणि जीवनातील सर्वात मोठा आधार होता.

या भजनातून मीराबाईंच्या त्या बेधडक आणि निस्सीम भक्तीची झलक दिसते. समाज काय म्हणले याची त्यांना त्यात बिलकूल चिंता नाही. त्यांची कृष्णभक्ती पाहून काही लोकांनी त्यांना वेडीही म्हटलं, पण मीराबाई आपल्या मार्गावरून कधीच हटल्या नाहीत.

बॉलिवूडनेही मीराबाईंच्या भजनातून घेतली प्रेरणा

मीराबाईंच्या भक्तीशी निगडीत या भजनाच्या प्रसिद्ध बोलांना कित्येक वर्षांनी, बॉलिवूडमध्ये एक नवं रूप मिळालं. 1982 साली प्रदर्शित झालेला ‘नमक हलाल’ हा चित्रपट सर्वांनाच आठवत असेल. याच चित्रपटात एक अतिशय लोकप्रिय गाणं होते, ते म्हणजे ‘पग घुंघरू बांध मीरा नाची थी’. या गाण्याची सुरूवातीची ओळ याच पारंपरिक भक्तिभावनेतून प्रेरित असल्याचं मानलं जातं. ‘नमक हलाल’ या चित्रपटासाठी गीतकार अनजान यांनी एका वेगळ्या अंदाजात हे गीत लिहीलं. तर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी आपल्या दमदार आवाजात ते गीत सादर केलं.

विशेष म्हणजे या गाण्यात अमिताभ बच्चन (Amitabbh Bachchan) यांचा खास अंदाज पाहायला मिळाला, तर त्यांच्यासोबत अभिनेत्री स्मिता पाटीलही दिसल्या. या गाण्याला बप्पी लाहिरी यांनी संगीत दिलं होतं. चित्रपटातील हे गाणं त्याच्या अतइशय वेगळ्या अंदाजामुळे अत्यंत लोकप्रिय झालं; मात्र त्याची मुळं ही मीराबाईंच्या शेकडो वर्षे जुन्या कृष्णभक्तीत रुजलेली आहेत. म्हणूनच जन्माष्टमीसारख्या विशेष प्रसंगी आजही मीराबाईंच्या भजनांची आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या गीतांची धून ऐकायला मिळते.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा