AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील ‘या’ शापित बंगल्यात राहिलेल्या 3 बॉलिवूड सेलिब्रिटींनी सर्वकाही गमावलं; झाले कर्जबाजारी

2014 मध्ये हा बंगला एका उद्योगपतीला 90 कोटी रुपयांना विकला गेला. फेब्रुवारी 2016 मध्ये नवीन मालकाने त्याच्या जागी नवीन मालमत्ता बांधण्यासाठी तो बंगला पाडला. इथेच बॉलिवूडमधल्या तीन मोठ्या सेलिब्रिटींचं घर असलेल्या त्या बंगल्याचा प्रवास संपला.

मुंबईतील 'या' शापित बंगल्यात राहिलेल्या 3 बॉलिवूड सेलिब्रिटींनी सर्वकाही गमावलं; झाले कर्जबाजारी
आशीर्वाद बंगलाImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 03, 2023 | 3:16 PM
Share

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : मुंबईतील कार्टर रोज हे सध्या शहरातील सर्वांत लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. या परिसरात बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील बरेच सेलिब्रिटी राहतात. पण हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजेच 1950 च्या दशकात या ठिकाणी पारशी आणि अँग्लो इंडियन समुदायाच्या मालकीचे बंगले होते. त्यावेळी अद्याप बॉलिवूड कार्टर रोडपर्यंत पोहोचलं नव्हतं. पण चित्रपटसृष्टीतील दोन मोठ्या व्यक्तींच्या मालकीचे दोन मोठे बंगले या परिसरात होते. संगीतकार नौशाद यांच्या मालकीचा ‘आशियाना’ हा बंगला इथे होता. मात्र आज आम्ही तुम्हाला एका दुसऱ्या बंगल्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्याचं नाव गेल्या अनेक वर्षांत बदललं गेलं. तरीही तो बंगला ‘आशीर्वाद’ या नावाने आजही ओळखला जातो.

‘आशीर्वाद’ बंगल्याचं बॉलिवूड कनेक्शन

त्याकाळी हा दोन मजली समुद्रकिनाऱ्याचा देखावा असलेला बंगला एका अँग्लो इंडियन कुटुंबाच्या मालकीचा होता. या बंगल्याचं मूळ नाव कोणाला माहीत नसलं तरी त्याचा पहिला मालक अनेकांना माहीत आहे. 1950 च्या सुरुवातीला अभिनेते भारत भूषण यांनी ही मालमत्ता विकत घेतली आणि नंतर कार्टर रोडवर राहणाऱ्या मोठ्या सेलिब्रिटींचा ट्रेंड सुरू झाला. भारत भूषण यांनी 50 च्या दशकात बैजू बावरा, मिर्झा गालिब, गेटवे ऑफ इंडिया आणि बरसात की रात यांसारख्या हिट चित्रपटांमधून चांगलं यश मिळवलं होतं. पण या दशकाच्या अखेरीस त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे त्यांना त्यांचा बंगला विकावा लागला होता. त्याचवेळी तो बंगला शापित किंवा पछाडलेला आहे अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. जो कोणी त्या बंगल्यात राहील त्याचं नुकसानच होईल, असं म्हटलं जात होतं.

राजेंद्र कुमार यांनी बंगल्याचं नाव ठेवलं ‘डिंपल’

1960 च्या दशकातील अभिनेते राजेंद्र कुमार यांना या बंगल्याबद्दल समजलं होतं. बंगल्याबद्दल पसरलेली अफवा आणि इतर चर्चांमुळे त्यावेळी तो फक्त 60 हजार रुपयांना उपलब्ध होता. राजेंद्र कुमार यांनी तो बंगला खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम मिळवण्यासाठी बी. आर. चोप्रा यांच्यासोबत तीन चित्रपटांचा करार केला आणि ते तिथं राहायला गेले. त्यांनी त्यांच्या मुलीच्या नावावरून बंगल्याचं नाव ‘डिंपल’ असं ठेवलं. मित्र मनोज कुमार यांच्या सांगण्यावरून त्यांनी घरावरील कथित शाप दूर करण्यासाठी पूजासुद्धा केली होती. राजेंद्र यांच्यासाठी तो बंगला भाग्यवान ठरला. कारण नंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. जुबली कुमार म्हणून त्यांची इंडस्ट्रीत ओळख झाली होती. पण भारत भूषण यांच्यासारखंच राजेंद्र कुमार यांनाही कठीण काळाचा सामना करावा लागला. 1968-69 च्या काळात त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि ते आर्थिक संकटात सापडले. अखेर मुख्य भूमिकांवरून सहाय्यक भूमिकांकडे वळताच त्यांना तो बंगला विकावा लागला.

राजेश खन्ना आणि त्यांचा प्रसिद्ध ‘आशीर्वाद’ बंगला

70 च्या दशकात तो बंगला अभिनेते राजेश खन्ना यांनी विकत घेतला होता. त्यानंतर ते इंडस्ट्रीतील नवीन सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. या दशकाच्या सुरुवातीलाच त्यांनी सलग 17 हिट चित्रपट दिले होते. त्यांचा ‘आशीर्वाद’ हा बंगला पर्यटकांसाठी जणू आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. सध्या जलसा आणि मन्नत या बंगल्यांची जशी क्रेझ आहे, तशी त्यावेळी आशीर्वाद या बंगल्याची क्रेझ चाहत्यांमध्ये होती. मात्र या बंगल्यातील आधीच्या दोन अभिनेत्यांच्या नशिबाप्रमाणेच राजेश खन्ना यांचंही यश टिकू शकलं नाही. इंडस्ट्रीतील त्यांचं काम कमी होऊ लागलं आणि अमिताभ बच्चन पुढे येऊ लागले होते. त्याचवेळी त्यांची पत्नी डिंपल मुलांना घेऊन त्यांना सोडून गेली. यशानेही राजेश खन्ना यांच्याकडे पाठ फिरवली होती. त्यावेळी राजेश खन्ना यांनी आशीर्वाद या बंगल्यापेक्षा त्यांच्या लिंकिंग रोडवरील ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवण्यासा सुरुवात केली होती. मात्र जवळपास तीन दशकांहून अधिक काळ ते त्या बंगल्यात राहिले होते.

2014 मध्ये हा बंगला एका उद्योगपतीला 90 कोटी रुपयांना विकला गेला. फेब्रुवारी 2016 मध्ये नवीन मालकाने त्याच्या जागी नवीन मालमत्ता बांधण्यासाठी तो बंगला पाडला. इथेच बॉलिवूडमधल्या तीन मोठ्या सेलिब्रिटींचं घर असलेल्या त्या बंगल्याचा प्रवास संपला.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....