AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varsha Usgaonkar: वडिलांचं अंत्यसंस्कारही वर्षा यांच्या नशिबात नव्हतं, कारण…

Varsha Usgaonkar: 'शेवटचा निरोप घेऊ शकले नाही, पण पापा...', वडिलांचं अंत्यसंस्कारही वर्षा उसगांवकर यांच्या नशिबात नव्हतं, व्हिडीओ पाहून येईल तुमच्याही डोळ्यात पाणी..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वर्षा उसगांवकर यांची चर्चा...

Varsha Usgaonkar: वडिलांचं अंत्यसंस्कारही वर्षा यांच्या नशिबात नव्हतं, कारण...
| Updated on: Aug 18, 2024 | 3:32 PM
Share

Varsha Usgaonkar: मराठी सिनेविश्वातील प्रिसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या काही दिवसांपासून वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस मराठी’ शोच्या पाचव्या भागामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’ शोमुळे वर्षा यांचं खासगी आयुष्य देखील प्रेक्षकांसमोर येऊ लागलं आहे. शोमध्ये नुकताच झालेल्या एका टास्कमध्ये स्पर्धकांनी आयुष्यातून कायम निघून गेलेल्या व्यक्तींबद्दल भावना व्यक्त करण्यास सांगिल्या.

‘बिग बॉस’ने टास्क दिल्यानंतर वर्षा उसगांवकर यांनी मोठा खुलासा केला. वर्षा उसगांवकर यांनी दिवंगत वडिलांबद्दल मत व्यक्त केलं. बिग बॉसने सांगितल्याप्रमाणे आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्तींना फोन लावून बोलण्याचा टास्क होता. अशात वर्षा यांनी वडिलांनी फोन केलं. अभिनेच्या वडिलांचं निधन 2020 मध्ये झालं आहे.

वर्षा उसगांवकर यांच्या वडिलांच निधन 16 जून 2020 मध्ये झालं होतं. पण तेव्हा प्रसंग आसा होता की, त्यांना वडिलांच्या अंत्यदर्शनही घेता आलं नाही. फोनवर रडत वर्षा उसगांवकर म्हणाल्या, ‘आज मला तुझी आठवण येतेय पप्पा… तू खुप मोठा माणूस होतास. कोरोनाचं संकट जगावर असल्यामुळे वडिलांचं अंत्यदर्शन देखील घेता आलं नाही.

व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अखेरचं वडिलांना पाहाता आलं… वडिलांच्या शिस्तीमुळे त्यांची प्रचंड भीती वाटायची… त्याच भीतीमुळे वडिलांवर किती प्रेम आहे… हे सांगणं राहून गेलं. वर्षा म्हणाल्या, ‘मला तुझा खूप अभिमान आहे. तू खूप चांगला नेता होतास. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.’

पुढे फोन ठेवताना वर्षा म्हणाल्या, माझे वडील कायम माझ्या पाठिशी आहेत… असंच मला वाटत असतं. असं देखील वर्षा उसगांवकर म्हणाल्या. वडिलांबद्दल भावना व्यक्त करत असताना वर्षा भावूक झाल्या. सध्या बिग बॉसमुळे वर्षा तुफान चर्चेत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.