AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakhi Sawant : त्यांनी आता लग्नाबाबत … विजय-त्रिशाबद्दल हे काय बोलून बसली राखी सावंत ?

थलपती विजयच्या निवडणुकीतील यशानंतर अभिनेत्री तृषासोबतच्या त्याच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राखी सावंतने धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. विजय आणि तृषाने आता लग्नच करावे, असे राखीचे म्हणणे आहे. तिने दोघांबाबत भाष्य करत, विजयच्या राजकीय यशाचेही कौतुक केले असून, त्यांच्या आगामी चित्रपटांची माहिती दिली आहे.

Rakhi Sawant : त्यांनी आता लग्नाबाबत ... विजय-त्रिशाबद्दल हे काय बोलून बसली राखी सावंत  ?
राखी सावंत हे काय बोलून गेली ?
| Updated on: May 09, 2026 | 8:01 AM
Share

थलपथी विजय सध्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील आपल्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. मात्र तर दुसरीकडे अभिनेत्री त्रिशा आणि त्याच्या डेटिंगच्या चर्चांना भलताच जोर चढला आहे. तामिळनाडू निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, त्या दोघांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याच दरम्यान, आता राखी सावंतने त्यांच्या डेटिंगच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, राखी सावंतने ‘घिल्ली’ स्टार्सच्या डेटिंगच्या अफवांवर भाष्य केलं. . एवढंच नव्हे तर त्यांनी लग्न करावं असंही तिचं म्हणणं आहे. मी त्रिशाला ओळखते, कारण आम्ही दोघींनी आमच्या करिअरची सुरुवात एकत्र केली होती असा दावाही राखी सावंतने केला आहे.

काय म्हणाली राखी सावंत ?

फिल्मी मंत्रा मीडियाशी बोलताना राखी, त्रिशा- वियबद्दल बोललाी. “मला वाटतं त्यांनी लग्न करावं. विजय आणि त्रिशाने लग्न करावं, आम्ही त्यांच्या मेहंदी समारंभाला जाऊ.” असं विधान राखीने केलं. यावेळी राखीने तामिळनाडू निवडणुकीतील विजयच्या विजयाबद्दलही आपलं मत व्यक्त केलं. ती म्हणाली, “तामिळनाडूमध्ये इतक्या जागा जिंकणारे ते पहिले ख्रिश्चन आहेत. त्यामुळे, ते मला वैयक्तिकरित्या आवडतात आणि विजयसोबत एक गाणं करणे हे माझं स्वप्न होते, पण मला ती संधी मिळाली नाही. मात्र, आता मला वाटतं की मी त्यांच्या पक्षात सामील व्हायला हवे.” असं म्हणत राखीने पक्षप्रवेशाची इच्छाही व्यक्त केली.

तृषा-विजयबद्दल काय म्हणाली राखी ?

मी तृषाला ओळखते, त्यांची जोडी खूप चांगली आहे, असं तृषा-विजय यांच्याबद्दल बोताना राखी पुढे म्हणाली. मी आणि तृषा, दोघींनी बॉलिवूडमध्ये एकत्र सुरूवात केली होती, पण नंतर तृषा साऊथला गेली आणि तिथे चित्रपटांत काम करू लागली. ‘ते (विजय) येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यामुळे त्याचा विजय निश्चित होता’ असंही शेवटी राखी म्हणाली.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे 2026 रोजी जाहीर झाले, आणि योगायोगाने तोच त्रिशाचा वाढदिवस होता. जेव्हा मतमोजणी सुरू होती आणि विजय आघाडीवर होते, तेव्हा त्रिशाने त्याच्या घरी भेटही दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्याच्या अफवा पसरत असल्या तरी, विजय किंवा त्रिशा या दोघांनीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

विजय – तृषाचे आगामी चित्रपट

तामिळनाडू निवडणुकीत थलपती विजयच्या यशानंतर, त्यांचे चाहते आता त्याच्या ‘जननायक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा विजय यांचा (अभिनेता म्हणून) शेवटचा चित्रपट असण्याची शक्यता असून, तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, त्रिशा ‘करुप्पू’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे, जो 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.