AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vikram Gokhale: विक्रम गोखले यांची शेवटची वेब सीरिज अपूर्णच राहणार? निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

'आंबेडकर: द लेजंड'मध्ये विक्रम गोखले बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत; सीरिजचं भवितव्य अंधारात

Vikram Gokhale: विक्रम गोखले यांची शेवटची वेब सीरिज अपूर्णच राहणार? निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
Vikram Gokhale: विक्रम गोखले यांची शेवटची वेब सीरिज अपूर्णच राहणार? Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 02, 2022 | 1:11 PM
Share

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी 26 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. ते 77 वर्षांचे होते. रंगभूमी, चित्रपट, टेलिव्हिजन अशा तिन्ही व्यासपीठांवर त्यांनी दमदार कामगिरी केली होती. आजारपणाच्या आधी ते एका वेब सीरिजचं शूटिंग करत होते. या वेब सीरिजचं अर्धच शूटिंग झालं होतं. आता विक्रम गोखलेंच्या निधनानंतर निर्मात्यांनी ती सीरिज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रम गोखले यांच्याशिवाय ती सीरिज पूर्ण करायची इच्छा नाही, असं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं.

विक्रम गोखलेंची अखेरची वेब सीरिज अपूर्णच राहणार?

‘आंबेडकर: द लेजंड’ या वेब सीरिजमध्ये विक्रम गोखले मुख्य भूमिका साकारत होते. या सीरिजच्या दोन एपिसोडचं शूटिंग पूर्ण झालं होतं. मात्र गोखलेंच्या निधनानंतर सीरिजचं काम अपूर्णच राहणार असल्याचं दिग्दर्शक संजीव जायस्वाल म्हणाले.

लखनऊमध्ये होणार होतं शूटिंग

“मला या प्रोजेक्टला रद्द करावं लागेल, कारण विक्रमजींशिवाय, ज्यांनी त्यात मुख्य भूमिका साकारली, मला हे अशक्य वाटतंय. दुसरा पर्याय असा आहे की या सीरिजचं शूटिंग मला नव्याने करावं लागेल आणि ते निश्चितच अधिक कठीण आहे. विक्रम गोखले यांनी गेल्या वर्षी जवळपास दोन एपिसोडचं शूटिंग पूर्ण केलं होतं. बाकीच्या शूटिंगसाठी आम्हाला लखनऊमध्ये सेट उभारायचा होता”, अशा माहिती दिग्दर्शकांनी दिली.

स्क्रीप्ट वाचून खूश झाले होते विक्रम गोखले

“विक्रम सरांसोबत माझा पहिला प्रोजेक्ट लखनऊमध्ये होता. त्यात त्यांनी एका प्रोफेसरची भूमिका साकारली होती. जेव्हा मी बाबासाहेबांच्या सीरिजची स्क्रिप्ट त्यांना वाचून दाखवली, तेव्हा ते खूप खूश झाले होते. त्यावर आम्ही लगेच काम सुरू केलं होतं”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

संजीव आणि विक्रम गोखले यांचा शेवटचा संवाद हा मार्च महिन्यात झाला होता. सीरिजच्या काही शूटिंगनंतर ते आजारी पडले. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शूटिंगची परवानगी मिळत नव्हती. या प्रोजेक्टसाठी ते खूप उत्साही होते, मात्र ती सीरिज आता त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.