AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुही चावलाचं ते गाणं ऐकून विनोद खन्ना रडले, झाली होती विचित्र अवस्था, आजही लाखो चाहत्यांचं फेवरेट

1989 मधील अत्यंत वेदनादायक गाणं. जे ऐकून विनोद खन्ना यांची रडून रडून झाली होती प्रचंड वाईट अवस्था. आजही प्रेक्षक त्या गाण्याचे आहेत वेडे.

जुही चावलाचं ते गाणं ऐकून विनोद खन्ना रडले, झाली होती विचित्र अवस्था, आजही लाखो चाहत्यांचं फेवरेट
| Updated on: Jan 09, 2026 | 1:03 PM
Share

1989 मध्ये प्रदर्शित झालेला यश चोप्रा दिग्दर्शित ‘चांदनी’ हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक क्लासिक चित्रपट मानला जातो. या चित्रपटात प्रेम, सौंदर्य आणि भावना यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. या चित्रपटातील जवळपास प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. मात्र, या चित्रपटातील एक गाणं असं होतं, ज्याने दुःख, वेदना आणि तुटलेल्या मनाची भावना इतक्या प्रभावीपणे मांडली की ते गाणं आजही अजरामर ठरलं आहे.

हे गाणं विनोद खन्ना, श्रीदेवी आणि जूही चावला यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. यामधील प्रसंग प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम करून जातो. गाण्यात विनोद खन्ना आपल्या मृत पत्नीची आठवण काढताना दिसतात. चित्रपटात जूही चावला यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारलेली असते. मात्र, तिचा अचानक मृत्यू होतो. पत्नीच्या आठवणींनी व्याकूळ झालेला नवरा, तिच्या आठवणीत अक्षरशः रडत आहे असं त्यामध्ये दाखवलेलं आहे. हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे.

या गाण्याचे बोल इतके वेदनादायक आहेत की ते ऐकताना कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. प्रेम हरवल्याची वेदना, एकटेपणा आणि न लागणारे मन या सगळ्या भावना या गाण्यातून ठळकपणे व्यक्त होतात. या गाण्यातील विनोद खन्ना यांचा अभिनय इतका प्रभावी आहे की प्रेक्षक त्यांच्या दुःखाशी सहजपणे एकरूप होतात.

लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं

विशेष म्हणजे, या गाण्यात श्रीदेवी पावसात भिजताना दिसत आहेत. पण विनोद खन्नांच्या मनात मात्र सतत त्यांच्या पत्नीची म्हणजेच जूही चावलाची प्रतिमा फिरत असते. श्रीदेवी समोर असतानाही त्यांचे मन भूतकाळात अडकलेले असते. ही भावनिक गुंतागुंत यश चोप्रांनी अतिशय सुंदर पद्धतीने दाखवली आहे.

‘चांदनी’ चित्रपटामधील हे गाणं केवळ एक गाणं नसून ते प्रेम आणि विरहाची एक कविता आहे. संगीत, शब्द, अभिनय आणि दृश्यरचना यांचा परिपूर्ण मेळ या गाण्यात पाहायला मिळतो. त्यामुळेच आज अनेक वर्षांनंतरही हे गाणं ऐकलं की त्या काळातील भावना, दुःख आणि आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात.

यश चोप्रां यांची हीच खासियत होती. प्रेमकथा सांगताना भावनांना शब्दांपलीकडे नेणे आणि ‘चांदनी’ चित्रपटामधील हे दुःखद गाणं त्याचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत