AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रितेशच्या भाऊच्या धक्क्यावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नाराज? केला संतप्त सवाल

'बिग बॉस मराठी 5'चा सूत्रसंचालक रितेश देशमुखवर प्रेक्षक नाराज झाले आहेत. निक्की तांबोळीला काहीच बोललं जात नाही, अशी अनेकांची तक्रार आहे. आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनेही पोस्ट लिहित नाराजी बोलून दाखवली आहे.

रितेशच्या भाऊच्या धक्क्यावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नाराज? केला संतप्त सवाल
Nikki Tamboli and Riteish DeshmukhImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 03, 2024 | 10:25 AM
Share

‘बिग बॉस मराठी 5’च्या घरातील निक्की तांबोळीमुळे घराबाहेरही बरेच वाद होताना पहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुखने निक्कीची बाजू घेतली आणि बी टीमला सुनावलं. यावरून प्रेक्षकांची तर नाराजी झालीच आहे. पण आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनेही यावरून संतप्त सवाल केला आहे. फक्त बी टीमला का धारेवर धरलं जातं, असा प्रश्न तिने सोशल मीडियावर केला आहे. ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडनंतर अभिनेत्री विशाखा सुभेदारने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्टच लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने निक्कीलाही चांगलंच सुनावलं आहे.

विशाखा सुभेदारची पोस्ट-

‘काल निक्की सोडून सगळेच चुकले. जे जे दिसलं त्यात सगळेच चुकीचे दिसले. अरबाजने प्यादं केलं उरलेल्या लोकांचं. मान्य चुकलंच. त्याच्यावर (अरबाज + निक्की) तुमचा गेम नकोच असायला. अरबाज आणि निक्की त्यांची त्यांची खेळी खेळत आहेत, तुम्ही तुमचं खेळा. आता धक्का बी टीमलाच आणि आम्हा प्रेक्षकांनासुद्धा. निक्कीने डबा फोडला. तिच्या ट्रॉमामुळे ती अंधारात गेली नाही. हा तिचा गेम होता. मग अभिजीतला त्याक्षणी टीम बीने सपोर्ट न करणं हा त्यांचा गेम असू शकत नाही? जेणेकरून निक्कीला आत जावंच लागेल. वैयक्तिक गेम आणि टीम स्पिरीटचा गेम आहे. घेतला एकत्र निर्णय. मग त्यांना मैत्रीचे का ढाचे आणि नियम असूनही ती सपोर्ट करत नाही, तिला काहीच बोललं गेलं नाही? का आणि ऑप्शन का दिला गेला? नियम म्हणून घरभर फिरायचं आणि टास्क करताना दुसरा गडी वापरायचं? फक्त बी टीमला का धारेवर धरलं जातं?

आता जरा निक्कीबद्दल.. या बाई.. निक्कीची चिक्की म्हणजे वाइल्ड कार्ड एण्ट्री.. आणि हा (मी जो पोस्ट करतेय तो) व्हिडीओ पाहिला मी आणि असं वाटलं की ही घरून ठरवूनच आलीय, एक हँडसम बिग बॉसने घरात तिच्यासाठी आणायचा (माझ्यासाठीच फक्त इति निक्की) आणि ती प्रेमाचे रंग उधळणार आणि त्याच्या बळाचा ही फायदा घेणार आणि आपण प्रेक्षक हे चाळे पाहणार. अरे हे काय आहे? किती स्वार्थी असावं? अप्पलपोटी, ढालगज आणि तिचं हे ज्ञान अभिजीत निमूट ऐकून कसं घेतो? ही निक्कीची सो कॉल्ड स्ट्रॅटर्जी? याआधी हे एकमेकांत गुंतणं आम्ही पाहिलंय (पण ते ठरवून नाही वाटलं, नंतर नंतर ते कळलंच). पण हे अग्रेशन खरं खोटं देवास ठाऊक आणि बाईच्या मिठीत स्वर्ग सारा हे सांगणारा प्रवचन या सिझनमध्येच ऐकला, पाहिला. अरबाज वैभव भिडले नाहीत. तशी निक्की आणि जान्हवी पण भिडले नाहीत. ती निक्की तर घाबरते जान्हवीला असं मला वाटतं. कारण ती तिच्यासमोर उतरत नाही. तिला उलट बोलत नाही आणि वैभव पण घाबरतो अरबाजला.

रितेशने निक्कीला काहीच सुनावलं नाही, म्हणून प्रेक्षकही नाराज झाले आहेत. ‘लोकांच्या नजरेत निक्कीची प्रतिमा चांगली बनवण्यासाठी बिग बॉस खूप मनापासून प्रयत्न करत आहे,’ असं एकाने लिहिलंय. तर ‘आम्हाला वाटतं भाऊचा धक्का म्हणजे आज जे चुकीचे वागलेत त्यांची शाळा घेणार. पण आज समजलं की निक्कीचं सगळं बरोबर असतं आणि बाकीच्यांचं चुकीच दाखवायचं. यासाठीच भाऊचा धक्का असतो,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘निक्कीसाठी बिग बॉस बनवलाय का’, असाही सवाल युजर्सनी केला आहे.

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.