AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

67th National Film Awards  | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोण देतं? कलाकारांची निवड कशी होते, त्यांना पुरस्कारात काय मिळते?, जाणून घ्या याबद्दल…

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नुकतेच दिल्लीत करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित केले. यावेळी ज्येष्ठ कलाकार रजनीकांत यांना सिनेमा जगतातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.

67th National Film Awards  | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोण देतं? कलाकारांची निवड कशी होते, त्यांना पुरस्कारात काय मिळते?, जाणून घ्या याबद्दल...
National Award
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 25, 2021 | 2:13 PM
Share

मुंबई : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नुकतेच दिल्लीत करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित केले. यावेळी ज्येष्ठ कलाकार रजनीकांत यांना सिनेमा जगतातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. तसे, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची घोषणा या वर्षी 22 मार्च रोजी करण्यात आली होती.

अनेकदा चर्चेत असणारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारतातील चित्रपट क्षेत्रात दिले जाणारे सर्वात महत्त्वाचे पुरस्कार आहेत. या पुरस्कारांची निवड कशी केली जाते आणि कलाकारांना पुरस्काराच्या स्वरूपात काय दिले जाते… तसेच या पुरस्कारांशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घ्या…

कोणाला मिळाले पुरस्कार?

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेते मनोज बाजपेयी आणि धनुष यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेत्री कंगना रनौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कंगना रनौतला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या सुपरहिट गाण्यासाठी गायक बी प्राक आणि मनोज बाजपेयी आणि दक्षिणेचा सुपरस्टार धनुष यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर, मराठमोळी गायिका सावनी रविंद्र हिला ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला.

कोण करतं कार्यक्रमाचे आयोजन?

हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केला आहे. हे चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे आयोजित केले जाते, मंत्रालयाची एक शाखा आणि DFF राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार, पुरस्कारांच्या घोषणेपासून समारंभ आयोजित करण्यापर्यंतचे काम हाताळते. मात्र, गेल्या वर्षी केंद्र सरकारने चित्रपट विभाग, चित्रपट महोत्सव संचालनालय, नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया आणि चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी यांचे विलीनीकरण करून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या स्थापनेला मान्यता दिली होती.

कसे निवडले जातात विजेते?

या पुरस्कारांसाठी, प्रथम चित्रपट निर्मात्यांकडून प्रवेशिका मागवल्या जातात, त्यानंतर सरकारकडून दोन्ही पुरस्कारांसाठी स्वतंत्र ज्युरी तयार केल्या जातात. ज्युरी सर्व चित्रपट पाहतात आणि प्रत्येक श्रेणीच्या आधारे अभिनेते आणि चित्रपटांची निवड केली जाते. यामध्ये सुमारे 90 पुरस्कार असून ते विविध श्रेणींमध्ये दिले जातात. यात वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट, विशेष चित्रपट, सर्वोत्तम लेखन, चित्रपट अनुकूल प्रदेश, विशेष उल्लेख इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये चित्रपट आणि कलाकार दोन्ही निवडले जातात.

निवड प्रक्रियेदरम्यान ज्युरींचे विचारविनिमय काटेकोरपणे गोपनीय असतात, जे सदस्यांना बाहेरील प्रभावापासून दूर ठेवण्यास मदत करतात आणि पुरस्कार विजेत्यांची निवड पूर्ण स्वातंत्र्य, निष्पक्षतेने केली जाते.

कोण देतं पुरस्कार?

तसे, राष्ट्रपतींद्वारे दिल्या जाणऱ्या पुरस्कारांमध्ये यांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जात असले, तरी काही वर्षांपासून उपराष्ट्रपती किंवा माहिती व प्रसारण मंत्रीही हे पुरस्कार प्रधान करत आहेत. काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला उपस्थित नसतानाही काही पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते तर काही पुरस्कार तत्कालीन मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले, तेव्हाही मोठा गोंधळ झाला होता. या वेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे पुरस्कार प्रदान करत आहेत.

यापुर्वी या पुरस्काराचा सोहळा दरवर्षी 3 मे रोजी आयोजित केला जात होता, परंतु लोकसभा निवडणूक 2019 आणि कोरोनामुळे त्याची कोणतीही निश्चित तारीख नव्हती. 50 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पुरस्कारात काय मिळते?

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रत्येक श्रेणीच्या आधारावर एक वेगळा पुरस्कार दिला जातो, जो रजत कमल, स्वर्ण कमल इत्यादी म्हणून ओळखला जातो. काही पुरस्कारांमध्ये रोख बक्षीस देखील दिले जाते, तर काही श्रेणींमध्ये फक्त पदक दिले जाते. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्याला स्वर्ण कमल, 10 लाख रुपये, सन्मानपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात येते. स्वर्ण कमल आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या विजेत्याला अडीच लाख रुपये दिले जातात. रजत कमल आणि दीड लाख रुपये अनेक श्रेणींमध्ये दिले जातात आणि काहींमध्ये एक लाख रुपये दिले जातात. प्रत्येक श्रेणीच्या आधारावर हे ठरवले जाते.

हेही वाचा :

Aryan Khan Drug Case : आधी शाहरुख, आता गौरी खान लेक आर्यनला भेटायला आर्थर रोड जेलमध्ये!

67th National Film Awards : रजनीकांत यांचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मान, पाहा पुरस्कारांचे मानकरी…

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक