AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मन्नतमध्ये काही बदल करण्याआधी शाहरूखला घ्यावी लागते न्यायालयाची परवानगी; आहे खास कारण

शाहरुख खान मन्नत सोडून नवीन घरात शिफ्ट झाला आहे. मन्नतमध्ये काही महत्त्वाचे बदल करायचे असल्यानं त्याला मन्नत सोडावा लागणार आहे. पण एक गोष्ट कमी जणांना माहित असेल की मन्नतमध्ये काहीही बदल करण्याआधी शाहरूखला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. त्यामागे काही खास कारण आहे.

मन्नतमध्ये काही बदल करण्याआधी शाहरूखला घ्यावी लागते न्यायालयाची परवानगी; आहे खास कारण
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Mar 01, 2025 | 10:25 AM
Share

शाहरुखच्या मन्नत बंगल्याची चर्चा ही सर्वत्र असते. मात्र आता शाहरूखला त्याचा मन्नत सोडावा लागला आहे.एका रिपोर्टनुसार त्याने मुंबईतील खार परिसरातील ‘पूजा कासा’नावाच्या बिल्डींगमध्ये दोन अपार्टमेंट भाडे तत्त्वार घेतले आहे. या दोन अपार्टमेंटसाठी 14 फेब्रुवारी रोजी ‘लीव अँड लाइसेंस अॅग्रीमेंट’ साइन करण्यात आलं आहे. अॅग्रीमेंटमध्ये दोन्ही अपार्टमेंटचे एकूण भाडे जवळपास 2.95 कोटी रूपये आहे. म्हणजेच दर महिन्याला शाहरूख 24.15 लाख रुपये भाडे देणार आहे. या घरासाटी 2.22 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी आणि 2000 रुपये रजिस्ट्रेशन फी भरण्यात आली आहे.

शाहरूख मन्नत का सोडतोय?

पण शाहरूखला त्याचा बंगला का सोडावा लागत आहे. कारण असं म्हटलं जात आहे की, शाहरूखच्या बंगल्यावर आणखी दोन मजले वाढवण्याचे काम सुरु होणार आहे. गौरी खानने ९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनजमेंट अॅथॉरिटीकडे बंगल्याचे आणथी दोन अतिरिक्त मजले वाढवण्यासाठी अर्ज केला आहे. म्हणजेच 616 क्वेअर फूट वाढवण्याची मागणी केली आहे. या कामासाठी परवानगी मिळाल्यामुळे शाहरुख कुटुंबीयांसोबत भाड्याच्या घरात शिफ्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे.

बंगल्यात काहीही बदल करायचा असल्यास आधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.

पण तुम्हाला माहितीये का की, शाहरुखला त्याच्या बंगल्यात काहीही बदल करायचा असल्यास आधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. त्याच्यामागे एक खास कारण आहे. मुंबईतील बँडस्टँडवर समुद्राच्या अगदी समोरच हा बंगला आहे. जवळपास दीडशे वर्षांपूर्वी बांधलेल्या या बंगल्याचं लवकरच नूतनीकरण केलं जाणार आहे. या आलिशान बंगल्याचं नूतनीकरण सहज होणारं नाही.

‘मन्नत’ बंगला Grade 2-B Heritage मध्ये येतो 

कारण ‘मन्नत’ बंगला Grade 2-B Heritage म्हणजे याला ऐतिहासिक महत्त्व असल्यानं ही वास्तू प्रत्यक्षात ‘वारसा दर्जा’ श्रेणीत येते. एखादी मालमत्ता, आस्थापना, स्थळ किंवा जागा यांना सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असल्यास त्यांना वारसा दर्जा प्राप्त होत असतो. 1995 मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रेटर मुंबईच्या वारसा स्थळांच्या पहिल्या यादीत शाहरुख खानच्या ‘मन्नत’चं नाव होतं. या बंगल्याला ग्रेड-3 मालमत्तेचा दर्जा देण्यात आला होता. त्याचे मूळ नाव ‘व्हिला वियना’ होतं.

यानंतर 2006 मध्ये नवीन यादीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई वारसा संवर्धन समितीने या मालमत्तेला ‘ग्रेड 2-ब’ चा दर्जा दिला. ‘मन्नत’ बंगला हा समुद्रकिनारी असल्यामुळे याला वास्तुशास्त्रीय महत्त्व असल्याचं मुंबई वारसा संवर्धन समितीकडून नमूद करण्यात आलं होतं. मुंबईतील वारसा मालमत्तांचे वर्गीकरण हे 3 मुख्य श्रेणींमध्ये केलं जातं.

शाहरुख खानने 2001 मध्ये ही मालमत्ता खरेदी केली होती

यात श्रेणी 1 मालमत्ता म्हणजे राष्ट्रीय किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या इमारती किंवा स्थळे, ज्यात उत्कृष्ट वास्तुशिल्प रचनांचादेखील समावेश होतो. तर श्रेणी 2 म्हणजे मालमत्तेमध्ये विशेष वास्तुशिल्प आणि सांस्कृतिक गुणवत्ता असलेल्या स्थानिक आणि प्रादेशिक इमारती व परिसर यांचा समाविष्ट होतो. तर श्रेणी 3 मध्ये शहराच्या लँडस्केपसाठी महत्त्वाच्या असलेल्या इमारती आणि स्थळे येतात.शाहरुख खानने 2001 मध्ये ही मालमत्ता खरेदी केली होती. त्यात कोणतेही संरचनात्मक बदल करण्याची परवानगी नव्हती म्हणून त्याने मूळ व्हिला (व्हिएन्ना) मागे 6 मजली इमारत बांधली आणि त्याचं नाव मन्नत ठेवलं.

महानगरपालिका आणि न्यायालयाकडून मान्यता घ्यावी लागते

ही मालमत्ता वांद्र्याच्या दक्षिणेकडील टोकावर, लँड्स एंड नावाच्या द्वीपकल्पीय जमिनीच्या पट्ट्यावर आहे, जी अरबी समुद्रापर्यंत पसरलेली आहे. या पट्ट्याच्या अगदी शेवटी त्याच्या दक्षिणेकडील टोकावर, वांद्रे किल्ल्याचे अवशेष आहेत. हा परिसर समुद्राच्या जवळ असल्याने, मालमत्ता मालकांना किनारी क्षेत्रांमध्ये विकास मंजुरीचे नियमन करण्यासाठी राज्याची नोडल एजन्सी असलेल्या MCZMA कडून मंजुरी घ्यावी लागेल. याशिवाय, महानगरपालिका आणि न्यायालयाकडून आवश्यक मान्यता घ्यावी लागेल.

म्हणून शाहरूखला परवानगी घेणं गरजेचं

शाहरुखच्या ‘मन्नत’मध्ये नूतनीकरणात दोन अतिरिक्त मजले जोडले जाणार आहेत. ज्यामुळे बिल्ट-अप क्षेत्रफळ 616.02 चौरस मीटर होईल. मालमत्तेची उंची वाढणार असल्यान, मंजुरी घेणे आवश्यक आहे. तसेच याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, “कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचे बांधकाम किंवा नूतनीकरण करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असेल, कारण मालमत्तेची उंची तसेच विस्तार काही स्वीकार्य मर्यादेतच ठेवावा लागेल” याशिवाय, नूतनीकरणाचे काम “शाश्वत” पद्धतीने केले पाहिजे, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. म्हणून शाहरूखला आपल्याचं घरात काहीह बदल करायचे असल्यास आधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!