AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर इस्त्रायलने डाव साधलाच, इराणचा मोठा अधिकारी ठार; थेट हल्ल्यात… युद्ध संपणार?

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या 17 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे आतापर्यंत हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. असे असतानाच आता इस्त्रायलने इराणबाबत मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे.

अखेर इस्त्रायलने डाव साधलाच, इराणचा मोठा अधिकारी ठार; थेट हल्ल्यात... युद्ध संपणार?
Gholamreza SoleimaniImage Credit source: एक्स
| Updated on: Mar 17, 2026 | 5:27 PM
Share

America Iran- Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आजचा 17 वा दिवस आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्याल आम्ही सोडणार नाही, असा इशारा इस्रायलकडून केला जात आहे. या युद्धामध्ये इस्रायलकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत या युद्धात अनेक इराणी सैन्य, अधिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचाही मृत्यू झाला आहे. असे असतानाच आता इस्रायलने हादरवून टाकणारा दावा केला आहे. इस्रायलने इराणच्या एका महत्त्वाच्या कमांडरला मारले आहे, असा दावा केला जातोय. इराणने मात्र अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

कमांडरला केले ठार, इराणला धक्का

इस्रायलने आम्ही इराणचे कमांडर गुलामरेजा सुलेमानी यांना ठार केले आहे, असा दावा केला आहे. सुलेमानी यांच्याकडे इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या (आयआरजीएस) बाजिस यूनिटचे सुलेमानी हे प्रमुख होते, असे सांगितले जात आहे. सुलेमानी यांच्या मृत्यूबाबतचे हे वृत्त खरे असेल इराणला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. इस्रायलने सुलेमानी यांच्यासोबतच इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांनाही ठार करण्यात आल्याचे सांगितले आहे. लारिजानी हे इराणच्या अनेक अधिकाऱ्यांपैकी एक महत्त्वाचे आणि शक्तीशाली अधिकारी होते.

इराणच्या संरक्षण विभागाने काय सांगितले?

या कथित कारवाईबाबत इराणच्या डिफेन्स फोर्सने माहिती दिली आहे. आयडीएफच्या हल्ल्यात लारिजानी आणि बसीज कमांडरला मारण्यात आले आहे. जो कोणी इस्रायलवर हल्ला करण्याची योजना आखेल त्याला आम्ही लक्ष्य करू, असे आयडीएफने म्हटले आहे. इस्रायलच्या या दाव्यावर इराणने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

निष्पाप इराणी नागरिकांचा मृत्यू

दरम्यान, पश्चिम आशियात अमेरिका-इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या 17 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाला 28 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली होती. या युद्धात इराणी निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याचे प्रमाण अधिक आहे. युद्धाचा परिणाम म्हणून संपूर्ण जगावर उर्जासंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे हे युद्ध नेमके कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!