ताडोबा फिरायला निघालेल्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफरीसाठी येत असलेल्या पर्यटकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. (Chandrapur car Accident)

ताडोबा फिरायला निघालेल्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 6:56 PM

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफरीसाठी येत असलेल्या पर्यटकांच्या वाहनाला भीषण अपघात (Accident of car) झाला आहे. हा अपघात चिमूर तालुक्यातील मासळ गावात घडला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 13 वर्षीय मुलीचा समावेश आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहन नागपूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. (Accident of car in Chandrapur Two dead Three injured)

मिळालेल्या माहितीनुसार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफरीसाठी काही पर्यटक चिमूरमार्गे जात होते. यावेळी मासळ गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात गाडी भडगा नाल्यात कोसल्याने गाडीतील सर्वच प्रवाशी जखमी झाले. या अपघातात सना अग्रवाल या 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तसेच, 40 वर्षीय मिनू अग्रवाल यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकूण 3 जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Accident of car in Chandrapur Two dead Three injured)

दरम्यान, अपघात झाल्याचे समजताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ बचावकार्य करत जखमींना रुग्णालयात रवाना केले. तसेच, नागरिकांनी सतर्कता दाखवत पोलिसांना पाचारण केले. यावेळी घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी तपासकार्य सुरू केले आहे. पोलिसांच्या तपासातून अपघातग्रस्त वाहन आणि पर्यटक नागपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अचानक अपघात झाल्याने सर्वांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त करण्यात आहे. (Accident of car in Chandrapur Two dead Three injured)

संबंधित बातम्या :

लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात; चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू

बीडमध्ये भीषण अपघात, वंचितच्या लातूर जिल्हाध्यक्षांसह पाच जणांचा मृत्यू

रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले; ओमनी कारला धक्का मारून खड्ड्यातून बाहेर काढलं

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.