नाकं मुरडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्यमंत्र्यांचा डोस, भीतीपोटी काम न थांबवण्याचा सल्ला

डॉक्टरांकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं, त्यांना देव मानलं जातं, त्यामुळे त्यांनी दवाखाने सुरु ठेवावेत, अशा शब्दात राजेश टोपेंनी डॉक्टरांचे कान टोचले. (Rajesh Tope slams Doctors closing clinics)

नाकं मुरडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्यमंत्र्यांचा डोस, भीतीपोटी काम न थांबवण्याचा सल्ला
Follow us
| Updated on: Mar 27, 2020 | 2:04 PM

मुंबई : महाराष्ट्रात एकूण 135 कोरोना पॉझिटिव्ह, तर 4 हजार 217 निगेटिव्ह केसेस आढळल्या आहेत. 19 कोरोनाग्रस्तांना आतापर्यंत डिस्चार्ज दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. भीतीपोटी काम न थांबवण्याचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी नाकं मुरडणाऱ्या डॉक्टरांना दिला. आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाविषयी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दैनंदिन अपडेट देण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. (Rajesh Tope slams Doctors closing clinics)

भीतीपोटी अनेक डॉक्टर बंद करत आहेत, हे चुकीचं आहे. डॉक्टरांकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं, त्यांना देव मानलं जातं, त्यामुळे त्यांनी दवाखाने सुरु ठेवावेत, डॉक्टरांनी तत्परता नाही दाखवली, तर सर्वसामान्यांनी जायचं कुठे? अशा शब्दात राजेश टोपेंनी डॉक्टरांचे कान टोचले.

अहमदनगरच्या आमदारांनी सांगितलेला अनुभव धक्कादायक होता. एका लहान मुलाची आई त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली होती, परंतु भीतीपोटी काही डॉक्टर तपासत नाहीत. ‘कोरोना’व्यतिरिक्तही अनेक दैनंदिन आजार असतात. राज्यभरातील डॉक्टरांनी दवाखाने सुरु ठेवावेत आणि उपचार करावे, असं टोपेंनी सांगितलं.

हेही वाचा : यकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण

रक्तदान करण्याविषयी वारंवार आवाहन केलं जात आहे. फक्त ‘कोविड19’साठीच नाही, तर अनेक आजारांसाठी रक्त लागतं. रक्ताचं शेल्फ लाईफ 35 दिवसांचं आहे. त्यामुळे रक्तसाठा वाढायला हवा. रक्तदान करण्यासाठी शिबीराच्या नियोजनाविषयी आखणी सुरु आहे. सोशल डिस्टन्स आणि शिस्त पाळून रक्तदान करा, असं आवाहन टोपेंनी केलं.

पीपीई आणि एन95 मास्क दिले जातातच, मात्र कोरोना रुग्ण किंवा संशयितांवर उपचार करताना, डॉक्टरांनी त्याचा आग्रह टाळावा. ते उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. लॉकडाऊनमुळे बाधित देशातून येणारे रुग्ण नसतील. आता कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातून झालेल्या ‘हाय रिस्क’ संपर्कांचा शोध घ्यावा लागेल, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं. (Rajesh Tope slams Doctors closing clinics)

जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तू घेताना social distance चा नियम पाळा. गरीब घटकांना मिळणारं मोफत धान्य शिस्तीने दुकानदारांनी द्यावं. सर्वपक्षीय, सामाजिक संघटना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी काही गोष्टी घरपोच द्याव्यात, शेती व्यवसाय सुरु राहिलाच पाहिजे, शेतीमाल बाजारपेठेत आला पाहिजे, प्रशासनाने मदत करावी, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

Rajesh Tope slams Doctors closing clinics

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.