AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील असा एक जिल्हा जिथे 9 महिन्यात झाला 42 जुळ्यांचा जन्म, नाव ऐकून व्हाल हैराण; काय आहे कारण

महाराष्ट्रात असं एक ठिकाण आहे, जेथे जुळ्या मुलांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे... महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात 9 महिन्यात तब्बल 42 जुळ्यांचा जन्म झाला आहे..., जिल्ह्याचं नाव ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल... जाणूघ्या का वाढतोय जुळ्या मुलांचा जन्मदर...

महाराष्ट्रातील असा एक जिल्हा जिथे 9 महिन्यात झाला 42 जुळ्यांचा जन्म, नाव ऐकून व्हाल हैराण; काय आहे कारण
फाईल फोटो
| Updated on: Oct 06, 2025 | 12:05 PM
Share

महाराष्ट्रात अनेक सरकारी रुग्णालय आहेत, जेथे मोफत रुग्णांवर उपचार होतात. शिवाय गरोदर महिलांसाठी देखील रुग्णालयात अनेक सुविधा असतात. पण महाराष्ट्रातील एक रुग्णालय सध्या सर्वत्र चर्चेत आहे. कारण या रुग्णालयात 9 महिन्यात तब्बल 42 जळ्या मुलांनी जन्म घेतला असून याचं कारण देखील समोर आहे. सध्या ज्या रुग्णलयाची चर्चा सुरु आहे ते रुग्णालय बीड सरकारी रुग्णालय आहे… जुळ्या मुलांचा वाढत्या जन्मदरावर येथील डॉक्टरांनी देखील मोठा खुलासा केला आहे. 9 महिन्यात एकाच रुग्णालयात 42 जुळ्या मुलांचा जन्म झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तुम्ही देखील चकित झाले असाल…

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी), इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) आणि कौटुंबिक इतिहास यासारख्या घटकांमुळे जुळ्या मुलांचा जन्म वाढतो आहे. तज्ज्ञांच्या मते, 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये जुळी मुले होण्याची शक्यता काही प्रमाणात वाढली आहे.

सांगायचं झालं तर, जुळी मुले बहुतेकदा वेळेपूर्वी जन्माला येतात, त्यामुळे अनेक बाळांच्या जन्मासाठी विशेष काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. बीड सिव्हिल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) डॉ. एल.आर. तंदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या कामाचा ताण हाताळण्यासाठी ही सुविधा पूर्णपणे सुसज्ज आहे.

डॉक्टर म्हणाले, ‘गेल्या काही वर्षात जुळ्या आणि तीन मुलांच्या जन्म दरात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. गेल्या 9 महिन्यात आमच्या रुग्णालयात 42 जुळ्या मुलांनी जन्म घेतला आहे. आमचे नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.’

‘रुग्णालयात प्रसूतीदरम्यान आणि नंतर माता आणि नवजात बालकांच्या  काळजीसाठी समर्पित एक विशेष वैद्यकीय पथक आहे. एवढंच नाही तर, नवजात बालकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या दिवसांमध्ये त्यांना पुरेशा सुविधा पुरवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेत आहेत.’ असं देखील डॉक्टर म्हणाले आहेत.

सांगायचं झालं तर, 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये जुळी मुले होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे. आता मुली करीयरला प्राधान्य देतात त्यामुळे लग्न आणि मुल होण्यासाठी उशीर होतो.  त्यामुळे 30 वर्षांनंतर फॅमिली प्लॅनिंगचा विचार लग्नानंतर होतो. एवढंच नाही तर, बदलत्या जीवनशैलीमुळे देखील महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे प्रेग्नेंसी लवकर राहत नाही.. अशी अनेक कारण आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...