AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health: मिठाच्या अति सेवनामुळे जडत आहेत गंभीर आजार, कसं ते जाणून घ्या; अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष

जेवणाला मीठाशिवाय चव येत नाही. आजकाल तर टूथपेस्टमध्येही मीठ (Salt) आहे का, असा प्रश्न विचारला जातो. एकूण काय, मीठाशिवाय आपलं पानही हलत नाही. अनेक जणांना शिजवलेल्या अन्नात वरून आणखीन मीठ घालायची सवय असते. पण हीच सवय आरोग्यासाठी (Health)अतिशय घातक ठरू शकते. जे लोक जेवताना, ताटातील पदार्थांवर आणखी मीठ घालून घेतात, त्यांचा वेळेपूर्वीच मृत्यू (Premature Death) […]

Health: मिठाच्या अति सेवनामुळे जडत आहेत गंभीर आजार, कसं ते जाणून घ्या; अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष
| Updated on: Jul 11, 2022 | 12:49 PM
Share

जेवणाला मीठाशिवाय चव येत नाही. आजकाल तर टूथपेस्टमध्येही मीठ (Salt) आहे का, असा प्रश्न विचारला जातो. एकूण काय, मीठाशिवाय आपलं पानही हलत नाही. अनेक जणांना शिजवलेल्या अन्नात वरून आणखीन मीठ घालायची सवय असते. पण हीच सवय आरोग्यासाठी (Health)अतिशय घातक ठरू शकते. जे लोक जेवताना, ताटातील पदार्थांवर आणखी मीठ घालून घेतात, त्यांचा वेळेपूर्वीच मृत्यू (Premature Death) होण्याचा धोका असतो. 5 लाखांहून अधिक लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये ही माहिती छापून आली आहे. ‘ जे लोक जेवणात कधीही (वरून) मीठ घालून घेत नाहीत किंवा क्वचितच मीठ घालतात, अशा लोकांच्या तुलनेत अन्नात वरतून मीठ घालून घेणाऱ्यांना वेळेपूर्वीच मृत्यू येण्याचा धोका 28 टक्के अधिक असतो.’ 40 ते 69 या वयोगटातील 100 पैकी तीन जणांना हा धोका असतो. जेवणात अतिरिक्त मीठाचा वापर केल्यानेच हा धोका वाढतो, असे या अभ्यासातून समोर आले आहे. तसेच जेवणात कमी मीठ घेणाऱ्यांपेक्षा अतिरिक्त मीठ खाणाऱ्यांचे आयुर्मानही कमी असते, असेही त्यात म्हटले आहे.

अमेरिकेतील, न्यू ऑर्लिन्स येथील ट्युलेन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ ॲंड ट्रॉपिकल मेडिसीन मधील प्रोफेसर ल्यु क्वी यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला आहे. जेवताना अतिरिक्त मीठाचा वापर आणि वेळेपूर्वी होणारे मृत्यू याच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास आमच्या संशोधनद्वारे करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य सुधारण्यासाठी जेवणाच्या पद्धतीत योग्य बदल करणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे. कमी मीठाद्वारे (लोकांच्या) सोडियमच्या ग्रहणात थोडासाही बदल झाल्यास त्याचा आरोग्याच्या दृष्टीने फार चांगला फायदा होऊ शकतो, असेही प्रोफेसर क्वी यांनी नमूद केले.

जास्त मीठ खाण्याने आरोग्यास अपाय होऊ शकतो. अतिरिक्त मीठामुळे बीपीसारख्या समस्या वाढू शकतात. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मीठामधील सोडियम शरीराला आवश्यक असते, मात्र त्याचे अतिरिक्त सेवन हृदयासाठी घातक ठरू शकते. सोडियम शरीरातील पाणी शोषून घेते. त्यामुळे अतिरिक्त मीठ खाल्ल्यास डी-हायड्रेशनचा त्रासही होऊ शकतो. आपल्याला जेवताना पापड, लोणचे, सॉस चटणी, चिप्स, वेफर्स असे अनेक पदार्थ खायची सवय असते. मात्र त्यात मीठाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे असे पदार्थ टाळणेच योग्य ठरते.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.