AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोजच्या जेवणात मिठाचं प्रमाण किती असावं? 99 टक्के लोकांना माहिती नाही योग्य प्रमाण

जेवणामध्ये किंवा इतर कोणत्याही खाद्यपदार्थांमध्ये मिठामुळे चव येते. मिठाचे कमी प्रमाणात सेवन केल्याने डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे मिठाचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.

रोजच्या जेवणात मिठाचं प्रमाण किती असावं? 99 टक्के लोकांना माहिती नाही योग्य प्रमाण
| Updated on: Nov 12, 2024 | 7:25 PM
Share

स्वयंपाकाला चव येते ती मिठामुळे काही जणांना जेवणात कमी मीठ लागते तर काहीजण जास्त मीठ टाकून पदार्थ खातात. मोठ्या प्रमाणात मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि हृदय विकार होऊ शकतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु शरीरात मीठ जास्त असणे जितके हानिकारक आहे. तितकेच ते कमी खाणे देखील जास्त धोकादायक आहे.

मिठाचे मुख्य घटक असलेल्या सोडियमच्या कमतरतेमुळे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. सोडियम आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यांचे नियोजन करते जसे की रक्तदाब राखणे, स्नायू आणि मज्जातंतूंचे सामान्य कार्य आणि शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे.मिठाच्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत त्याच्या आरोग्यावर काय परिणाम होतात आणि दररोज किती प्रमाणात मीठ खाणे हे गरजेचे आहे ते जाणून घेऊ.

भूक न लागणे

मिठाच्या कमतरतेमुळे भूक कमी होते हे फार कमी लोकांना माहिती आहे.तज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते तेव्हा त्याचा परिणाम मज्जा संस्था आणि मेंदूच्या भूक नियंत्रित करणाऱ्या भागावर होतो. त्यामुळे भूक मंदावते आणि भूक न लागल्यामुळे पोषक तत्वांची कमतरता तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ज्यामुळे शरीराला संसर्गजन्य आजात होण्याची शक्यता वाढते.

चक्कर येणे

शरीरातील सोडियमचे संतुलन हे रक्तदाबावर परिणाम करते. सोडियमच्या कमतरतेमुळे रक्तदाब पातळी कमी होते जे सामान्य आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सोडियमच्या कमतरतेमुळे रक्तदाब कमी झाल्याने माणसाला चक्कर येते ही स्थिती गंभीर असू शकते. विशेषतः ज्यांना आधीच कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी.

डोके दुखणे

शरीरात मिठाच्या कमतरतेच एक सामान्य लक्षण म्हणजे डोकेदुखी आहे. मिठामध्ये असलेले सोडियम शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करते. जेव्हा शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते तेव्हा ते असंतुलन निर्माण करते ज्यामुळे शरीरातील निर्जलीकरणाचा धोका वाढतो.

थकवा आणि स्नायू कमकुवतपणा

सोडियमची कमतरता स्नायू आणि मज्जातंतूंच्या सामान्य कार्यात व्यत्यय आणू शकते मज्जातंतूंचे रक्ताभिसरण सुरळीत राखण्यासाठी सोडियम उपयुक्त आहे.

मिठाचे सेवन किती करावे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार प्रौढ व्यक्तीने दररोज जास्तीत जास्त पाच ग्रॅम मीठ खावे. अंदाजे एक चमचा इतके आहे. पाच ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाणे शरीरासाठी हानिकारक असू शकते आणि रक्तदाब, ह्रदयरोग तसेच पक्षघाताचा धोका वाढू शकतो.

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.