AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोजच्या जेवणात मिठाचं प्रमाण किती असावं? 99 टक्के लोकांना माहिती नाही योग्य प्रमाण

जेवणामध्ये किंवा इतर कोणत्याही खाद्यपदार्थांमध्ये मिठामुळे चव येते. मिठाचे कमी प्रमाणात सेवन केल्याने डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे मिठाचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.

रोजच्या जेवणात मिठाचं प्रमाण किती असावं? 99 टक्के लोकांना माहिती नाही योग्य प्रमाण
| Updated on: Nov 12, 2024 | 7:25 PM
Share

स्वयंपाकाला चव येते ती मिठामुळे काही जणांना जेवणात कमी मीठ लागते तर काहीजण जास्त मीठ टाकून पदार्थ खातात. मोठ्या प्रमाणात मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि हृदय विकार होऊ शकतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु शरीरात मीठ जास्त असणे जितके हानिकारक आहे. तितकेच ते कमी खाणे देखील जास्त धोकादायक आहे.

मिठाचे मुख्य घटक असलेल्या सोडियमच्या कमतरतेमुळे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. सोडियम आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यांचे नियोजन करते जसे की रक्तदाब राखणे, स्नायू आणि मज्जातंतूंचे सामान्य कार्य आणि शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे.मिठाच्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत त्याच्या आरोग्यावर काय परिणाम होतात आणि दररोज किती प्रमाणात मीठ खाणे हे गरजेचे आहे ते जाणून घेऊ.

भूक न लागणे

मिठाच्या कमतरतेमुळे भूक कमी होते हे फार कमी लोकांना माहिती आहे.तज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते तेव्हा त्याचा परिणाम मज्जा संस्था आणि मेंदूच्या भूक नियंत्रित करणाऱ्या भागावर होतो. त्यामुळे भूक मंदावते आणि भूक न लागल्यामुळे पोषक तत्वांची कमतरता तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ज्यामुळे शरीराला संसर्गजन्य आजात होण्याची शक्यता वाढते.

चक्कर येणे

शरीरातील सोडियमचे संतुलन हे रक्तदाबावर परिणाम करते. सोडियमच्या कमतरतेमुळे रक्तदाब पातळी कमी होते जे सामान्य आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सोडियमच्या कमतरतेमुळे रक्तदाब कमी झाल्याने माणसाला चक्कर येते ही स्थिती गंभीर असू शकते. विशेषतः ज्यांना आधीच कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी.

डोके दुखणे

शरीरात मिठाच्या कमतरतेच एक सामान्य लक्षण म्हणजे डोकेदुखी आहे. मिठामध्ये असलेले सोडियम शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करते. जेव्हा शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते तेव्हा ते असंतुलन निर्माण करते ज्यामुळे शरीरातील निर्जलीकरणाचा धोका वाढतो.

थकवा आणि स्नायू कमकुवतपणा

सोडियमची कमतरता स्नायू आणि मज्जातंतूंच्या सामान्य कार्यात व्यत्यय आणू शकते मज्जातंतूंचे रक्ताभिसरण सुरळीत राखण्यासाठी सोडियम उपयुक्त आहे.

मिठाचे सेवन किती करावे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार प्रौढ व्यक्तीने दररोज जास्तीत जास्त पाच ग्रॅम मीठ खावे. अंदाजे एक चमचा इतके आहे. पाच ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाणे शरीरासाठी हानिकारक असू शकते आणि रक्तदाब, ह्रदयरोग तसेच पक्षघाताचा धोका वाढू शकतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.