AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हा सावध… ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण

आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडं जरी काही दुखत असेल तर आपण दुर्लक्ष करतो. पण काही आजार असं देखील असतात, जे आपल्याला कळतच नाहीत... आजार मुकपणे जीव घेणारे देखील ठरु शकतात... त्यांचे काही लक्षणही जाणवत नाहीत...

व्हा सावध... 'हे' आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण
| Updated on: Apr 27, 2026 | 4:08 PM
Share

ऑफिसमधील कामाचा ताण, घराची जबाबदारी.. अशा अनेक गोष्टींमुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देतच नाही. परणामी एक दिवस असा येतो, ज्यामुळे एका गंभीर आजाराच्या विळख्यात आपण सापडतो आणि त्याचे लक्षणं देखील आपल्याचा जाणवत नाही… सहसा, शरीराच्या कोणत्याही भागात वेदना, थोडा थकवा किंवा जळजळ जाणवल्यास, आपल्याला वाटतं की आपले आरोग्य ठीक नाही. परंतु काही आजार कोणत्याही स्पष्ट लक्षणांशिवाय शरीरात हळूहळू वाढतात. यांना ‘शांत आजार’ म्हणजे Silent Diseases असं देखील म्हणतात. असे आजार आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकतात. शिवाय, ते उशिरा लक्षात येण्याचा धोकाही असतो. तर मग हे आजार कोणते आहेत? त्यांची लक्षणे का दिसत नाहीत? त्यांना टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

लक्षणे न दिसता उद्भवणारे आजार कोणते आहेत?

तज्ज्ञांनी सांगतिल्यानुसार, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या, थायरॉईडचे असंतुलन आणि काही प्रकारचे कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणं दाखवत नाहीत. ते हळूहळू शरीराच्या अवयवांना नुकसान पोहोचवतात. बरेच लोक सहसा थकवा आणि सुस्तीकडे दुर्लक्ष करतात. पुढे, यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

लक्षणं लगेच का दिसून येत नाहीत?

काही आजार हळूहळू वाढतात. त्यामुळे त्यांची लक्षणं लगेच दिसून येत नाहीत. शरीर काही काळ अंतर्गत बदलांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करते. परिणामी, व्यक्तीला कोणतीही अस्वस्थता जाणवत नाही. तसेच, सुरुवातीची लक्षणं इतकी सौम्य असतात की त्यांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

कोणती खबरदारी घ्यावी?

अशा आजारांना प्रतिबंध करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. वर्षातून एकदा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्य तपासणी करून घेणं उत्तम ठरेल. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावाचं व्यवस्थापन आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे, शरीरातील किरकोळ बदलांकडेही दुर्लक्ष करू नये.

कोणतीही लक्षणे दिसल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजाराचे वेळेवर निदान झाल्यास उपचार करणे सोपे जाते. यामुळे, भविष्यात उद्भवू शकणाऱ्या गंभीर समस्या टाळता येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतेही बदल करण्यापूर्वी सर्वातआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Follow Us
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.