AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

तुम्ही हिवाळ्यातही थंड पाण्याने अंघोळ करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केली जाते, हे तुम्हाला माहिती आहे. पण भारतात आजही कडाक्याच्या थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करण्याची लोकांना सवय आहे. आंघोळीची ही जुनी पद्धत किती फायदेशीर आहे माहित आहे का? हे आम्ही तुम्हाला या सांगणार आहोत. जाणून घेऊया.

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करणे योग्य आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Dec 23, 2024 | 3:36 PM
Share

भारतात असे लोक आहेत ज्यांना थंड हवामानातही थंड किंवा नॉर्मल पाण्याने आंघोळ करायला आवडते. असे मानले जाते की जिथे गरम पाण्याने आंघोळ केल्यावर थंडी जाणवते, तेथे थंड पाण्याने उलट होते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने अनेक फायदे होतात, असे म्हटले जाते. याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज सुरू आहेत.

काही लोक रोज आंघोळ करणे टाळतात. भारतातील बहुतांश भागात हिवाळा अधिक त्रासदायक असतो. थंड वारा आणि कडाक्याच्या थंडीमुळे परिस्थिती बिघडते. त्यामुळे आंघोळ करणारे बहुतेक जण गरम पाण्याने आंघोळ करून घराबाहेर पडतात. पण, थंड पाण्याने अंघोळ करण्याचे काय फायदे आहेत, जाणून घेऊया.

काही लोकांचा असा विश्वास आहे की, थंड पाण्यानं अंघोळ केल्यानं स्ट्रोक होऊ शकतो, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की अशा प्रकारे आंघोळ केल्याने आपल्याला दिवसभर थंडी जाणवत नाही. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आपण हे केले पाहिजे कारण काही वेळा या पद्धतीमुळे नुकसानही होते.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्यास काय होते? हे कोणते फायदे देते? तसेच, आपण काय लक्षात ठेवले पाहिजे.

थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करा

अंकित बन्सल (कन्सल्टंट, इंटरनल मेडिसिन अँड इन्फेक्शन डिसीज, श्री बालाजी अ‍ॅक्शन हॉस्पिटल) सांगतात की, दिल्लीच्या हिवाळ्यात अनेकदा लोकांना गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते, पण जर तुम्ही नॉर्मल ताज्या पाण्याने अंघोळ केली तर ते तुमच्यासाठीही फायदेशीर आहे. हिवाळ्याच्या ऋतूत थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

याशिवाय त्वचा चमकदार आणि निरोगी होते, आपल्या शरीराचे स्नायूही मजबूत असतात, ज्यामुळे या वेळी व्यायाम आणि इतर शारीरिक क्रियांमध्ये तुम्हाला खूप मदत होते, यामुळे तुमचे मानसिक आरोग्यही सुधारते.

गरम पाण्याने अंघोळ करण्याचे तोटे

कडाक्याच्या थंडीतही कोमट पाण्याने आंघोळ करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जास्त गरम पाणी त्वचा आणि केस दोघांनाही नुकसान पोहोचवते. गरम पाणी थेट केसांवर टाकल्याने ते कमकुवत होऊ लागतात. याशिवाय त्यांच्यात कोरडेपणा येतो आणि चमकही कमी होते. त्याचबरोबर त्वचेतील कोरडेपणा आणि चमक कमी होण्याची भीती असते. आंघोळीत गरम पाणी चांगलं वाटत असलं तरी त्यामुळे आणखी अनेक नुकसान होतं.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

थंड पाण्याने आंघोळ करताना हे लक्षात ठेवावे की, आंघोळीदरम्यान थेट डोक्यातून थंड पाण्याने आंघोळ करू नये, हाता-पायावर पाणी ओतल्यानंतर प्रथम ते आपल्या शरीरावर घालावे. याशिवाय इतरही काही गोष्टी लक्षात ठेवा, तुमचे आरोग्य लक्षात घेऊन थंड पाण्याने आंघोळ करावी, तुमची तब्येत चांगली नसेल किंवा तुम्हाला आरोग्याची कोणतीही समस्या असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष...
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि चीनमध्ये सात महत्त्वाचे करार झाले. हे करार दोन्ही देशांमधील संबंधांना रणनीतिक आणि दीर्घकालीन स्वरूप देतील, सीमावादावर तोडगा काढतील, आर्थिक संबंध वाढवतील आणि जागतिक आव्हानांवर सहकार्य करतील.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार