AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Obesity Control: लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतोय? ‘या’ ट्रिक्स करतील वजन कमी…..

Obesity Controlling Tips: भारतात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनत आहे. WHO च्या मते, जगभरातील मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण 1990 च्या तुलनेत 2024 मध्ये चौपट वाढण्याची अपेक्षा आहे. वाढत्या लठ्ठपणामुळे मुलांमध्ये मधुमेह आणि हृदयरोगांचे प्रमाणही वाढले आहे.

Obesity Control: लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतोय? 'या' ट्रिक्स करतील वजन कमी.....
| Edited By: | Updated on: Feb 28, 2025 | 10:02 PM
Share

गेल्या काही वर्षांत अगदी कमी वयाच्या मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसतेय. लठ्ठपणा वाढल्यामुळे एक अहवाल खूप प्रसिद्ध झाला आहे. जागतिक स्थूलता अहवालामध्ये असे सांगितले आहे की गेल्या काही वर्षांपासून मोठ्यांपेक्षा लहान वयाच्या मुलांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. आव्हालामध्ये याचे अनेक कारणं सांगितले आहेत. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. वाढत्या लठ्ठपणामुळे लहानमुलांमध्ये मधुमेहापासून आणि हृदयरोग यांच्या सारख्या समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणामुळे लहानमुलांमध्ये लठ्ठपणा वाढल्यास त्यांची शारीरिक हालचाल कमी होते.

मुलांमधील मोबाईलचा वापर वाढलाय. यामुळे मुलांची शारीरिक हालचाल होत नाही आणि वजन वाढते. त्यासोबतच आजकाल मुलं जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन करतात ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स जमा होतात आणि शरीरातील चरबी वाढते. वजन वाढल्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराच्या समस्या वाढतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरातील मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण 1990 च्या तुलनेत 2024 मध्ये चौपट वाढण्याची अपेक्षा आहे. भारतासह अनेक देशांमध्ये मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. यामुळे मुलांमध्ये टाइप-2 मधुमेह आणि हृदयरोगाचे रुग्णही वाढले आहेत. काही प्रकरणांमध्ये, हृदयरोगामुळे मुलांचा मृत्यू देखील झाला आहे. लठ्ठपणामुळे मुलांमध्ये हार्मोनल असंतुलनासारख्या समस्या देखील दिसून आल्या आहेत. यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे मुलांची जीवनशैली बिघडली आहे. आता मुले मोबाईल आणि संगणकासमोर बसून जास्त वेळ घालवतात, ज्यामुळे त्यांच्यात शारीरिक हालचालींचा अभाव असतो.

मुलांमध्ये जंक फूड खाण्याचा ट्रेंडही झपाट्याने वाढत आहे. याशिवाय, लठ्ठपणा वाढण्याची अनेक कारणे आहेत. लठ्ठपणा अनुवंशिकतेमुळे देखील असू शकतो. काही प्रकरणांमध्ये, ताण आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्य समस्या देखील लठ्ठपणाला चालना देऊ शकतात. मुलांना खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा. मुलांच्या आहारात पीठ, साखर आणि मीठ यांचे सेवन कमीत कमी करा. मुलांना विनाकारण फोन आणि लॅपटॉप वापरू देऊ नका. घरातील वातावरण चांगले ठेवा आणि मुलांना मानसिक ताण देऊ नका.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा….

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

जंक फूडचे सेवन करण्यापेक्षा घरचे सात्विक जेवण जेवा.

तेलकट पदार्थाचे सेवन टाळा ज्यामुळे वजन वाढणार नाही.

जास्त प्रमाणात मोबाईलचा वापर करण्यापेक्षा शरीरिक हालचाल करा.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...