‘कुपोषणा’ ला आळा घालण्यासाठी विविध ‘प्रथिनां’चे सेवन ठरते फायदेशीर!
वनस्पती-आधारित प्रथिने आणि सोया प्रथिने मुलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात आणि देशातील अन्न शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून शिफारस करत आहेत की सरकारने ही उत्पादने शालेय मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजनेसारख्या सरकारी कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करावीत.
मुंबई – अन्न पुरेशा प्रमाणात असूनही, भारतातील मुले कुपोषीत (malnutrition)आहेत. 2014-15 मध्ये प्रथिनांची कमतरता, कुपोषण या आजारामुळे 37% भारतीय मुले ग्रस्त होती, तर, 21% मुले कमी वजनाची 34% अती तीव्र कमी वजनाची होती. दुर्दैवाने, साथीच्या रोगाच्या काळात मुलांमधील हे कुपोषणाचे प्रमाण वाढले असण्याची शक्यता आहे. भारतीय घरांमध्ये तांदूळ आणि गहू (Wheat and Rice)यांसारख्या मुख्य धान्यांच्या वापरावर सतत लक्ष केंद्रित केल्यामुळे आहारातील विविधता आणि शरीराच्या कार्ये संतुलित करण्यासाठी तितकेच महत्त्वपूर्ण असलेल्या इतर पोषक तत्वांचे सेवन टाळले जाते. ‘नॅशनल न्यूट्रिशन मॉनिटरिंग बोर्डाने’ केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, भारतीय आहारांमध्ये जवळजवळ ६०% प्रथिने तृणधान्यांमधून मिळतात ज्यांची पचनक्षमता आणि गुणवत्ता तुलनेने कमी असते. ICAR-नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेसचे माजी संचालक प्रा. केसी बन्सल म्हणतात, “पाच वर्षांखालील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण खूप जास्त आणि व्यापक असल्याने अन्नाच्या गुणवत्तेबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी देशात ‘मिशन मोड एज्युकेशन’ (mission mode education)प्रोग्राम सुरू केला गेला पाहिजे. आपण खात असलेल्या, बाजरी आणि कडधान्ये यांसारख्या विविध स्त्रोतांचा वापर करत असलेल्या अन्नाच्या गुणवत्तेत मूल्य वाढवणे खूप महत्त्वाचे आहे,”
‘पीएम पोषण योजने’ त बाजरी चा समावेश
शालेय मुलांमधील अशा पोषणविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी, केंद्र सरकारने 2001 मध्ये सर्व राज्यांमध्ये माध्यान्ह भोजन योजना सुरू केली. ही अत्यंत प्रभावी योजना असून, याअंतर्गंत सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुलांना दररोज दुपारच्या जेवणासाठी ताजे शिजवलेले आणि पौष्टिक अन्न दिले जाते. सरकारने आता राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘पीएम पोषन योजनें’ तर्गत माध्यान्ह भोजनात बाजरी समाविष्ट करण्याची विनंती केली आहे जेणेकरून जेवणात प्रथिनांची गुणवत्ता वाढेल.
वनस्पती आधारित प्रथिने फायदेशीर
वनस्पती-आधारित प्रथिने आणि सोया प्रथिने मुलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात आणि देशातील अन्न शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून शिफारस करत आहेत की सरकारने ही उत्पादने शालेय मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजनेसारख्या सरकारी कार्यक्रमांमध्ये समाविष्ट करावीत. ‘गुड फूड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ चे व्यवस्थापकीय संचालक वरुण देशपांडे यांच्या मते,“वनस्पती-आधारित मांसासारख्या उत्पादनांनी सोया प्रथिनासारख्या उत्पादनांच्या मागील पिढीला मागे टाकले आहे. ते मटण आणि चिकनची चव देत आहेत. योग्य चवीसह योग्य किंमतीत प्रथिने मिळवण्याची ही संधी असावी आणि सरकार येथे मोठी भूमिका बजावू शकते. उदाहरणार्थ, हे नवीन खाद्यपदार्थ मध्यान्ह भोजन सारख्या ‘पोषण सुरक्षा योजनां’ मध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात.”
मॉक मीट आणि सोया मधून मिळते उच्च प्रथिने
केवळ शाळांमध्येच नाही, तर घरातही, मुलांच्या ठराविक आहारांमध्ये त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले योग्य पोषण आणि प्रथिने कमी असतात. देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, आज अन्न शास्त्राने तांदूळ, चपाती इत्यादी मुख्य अन्नपदार्थ अधिक प्रथिनयुक्त पदार्थांसह मजबूत करण्यासाठी वापरल्या जाणार्या पद्धतींमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या नेहमीच्या स्रोतांव्यतिरिक्त, मॉक मीट हे देखील चांगले पर्याय आहेत जे शाकाहारी घरांमध्ये सहजपणे खाऊ शकतात. अभिनेत्री आणि सेलिब्रिटी फिटनेस साठी लोकप्रिय असलेली मंदिरा बेदी देखील प्रथिनांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मॉक मीट आणि सोयाबीनच्या महत्त्वाचे समर्थन करते. “मला दररोज किमान 20-30 ग्रॅम प्रथिने लागतात. पूर्वी माझ्याकडे फक्त अंडी आणि चीज हेच पर्याय होते. उच्च दर्जाच्या प्रथिनांमुळे आज माझी पसंती मॉक मींट आणि सोयाकडे वळली आहे.
प्रथिनांच्या नवीन स्त्रोतांबद्दल सर्वांना माहिती हवी
अशा प्रकारे शाकाहारी कुटुंबांमध्ये प्रथिनेयुक्त पदार्थांबद्दल जागरूकता निर्माण करणे महत्वाचे आहे जे प्राण्यांच्या मासांला चांगले पर्याय आहेत. यामुळे मुलांमध्ये निरोगी आहाराच्या सवयी जोपासण्यात मदत होईल आणि ते मोठे झाल्यावर माहितीपूर्ण निवडी करू शकतील. देशपांडे म्हणतात, “उच्च पौष्टिक मूल्य असलेल्या, चवीला उत्तम आणि परवडणाऱ्या किमतीत मिळणाऱ्या अन्नाचे उत्पादन सक्षम करण्यासाठी समाज, उद्योग आणि सरकार यांनी एकत्र येणे आणि अन्न विज्ञानाचा वापर करणे ही जबाबदारी आहे.” घरातील खाण्याच्या सवयी संतुलित आहेत याची खात्री करण्यासाठी कुटुंबांनी प्रथिनांच्या नवीन स्त्रोतांबद्दल स्वतःला शिक्षित केले पाहिजे. सुप्रसिद्ध पोषण प्रचारक आणि वन हेल्थ प्लॅटफॉर्मच्या संस्थापक डॉ. शिखा शर्मा संपूर्ण धान्य आणि विविध प्रकारच्या भाज्या असलेल्या वैविध्यपूर्ण आहाराचा सल्ला देतात. त्या सुचवितात की, “कुटुंबांनी दररोज वेगवेगळ्या भाज्या खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सूर्यफूल, तूप आणि मोहरीचे तेल यांसारखे वेगवेगळे तेल स्वयंपाकासाठी वापरावे. काकडी, गाजर इत्यादी सॅलड्सचे सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे. याचबरोबर “शालेय अभ्यासक्रमात शालेय अभ्यासक्रमात आहाराचे शिक्षण समाविष्ट केले पाहिजे कारण यामुळे त्यांच्या जीवनात सुरुवातीपासूनच चांगल्या खाण्याच्या सवयी लावण्यास मदत होईल.”