AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना प्रतिबंधक लसींचा हार्ट अटॅकशी काही संबंध आहे का ? संशोधकांनी काय म्हटलं ?

या संशोधनाच्या टीमने ऑगस्ट 2021 आणि ऑगस्ट 2022 दरम्यान जीबी पंत रुग्णालयात दाखल 1,578 हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांचा अभ्यास केला.

कोरोना प्रतिबंधक लसींचा हार्ट अटॅकशी काही संबंध आहे का ? संशोधकांनी काय म्हटलं ?
heart attack Image Credit source: socialmedia
| Updated on: May 01, 2024 | 10:29 PM
Share

नवी दिल्ली | 4 सप्टेंबर 2023 : कोरानाच्या साथीनंतर अचानक तरुणांचे हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे या प्रकारामागे कोविड-19 काळात झालेले लसीकरणाला जबाबदार धरले जात होते. परंतू राजधानी दिल्ली येथील जीबी पंत रुग्णालयात कोरोनाकाळानंतर अचानक हृदय विकाराने झालेल्या तरुणाच्या मृत्यूंचा अभ्यास केला जात होता. परंतू कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन लसींमुळे हे हृदयविकाराचे मृत्यू झाले आहेत का ? काय संशोधनातून उघड झाले पाहूया…

गोविंद वल्लभपंत इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडीकल एज्युकेशन एण्ड रिसर्च या रुग्णालयाच्या कार्डीओलॉजी विभागाचे डॉ. मोहित डी. गुप्ता यांनी याबाबत महत्वाची माहीती दिली आहे. डॉ. गुप्ता यांचा अभ्यास पीएलओएस वन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात म्हटले आहे की कोविड-19 लसींच्या मायोकोर्डीया इन्फेक्शन ( एएमआय ) नंतर 30 दिवस आणि सहा महिन्यात मृत्यूदर कमी असल्याचे आढळले. हे संशोधन एएमआय रुग्णांच्या मोठ्या संख्येवर झालेले पहिलेच अशा प्रकारचे संशोधन आहे. ज्यात स्पष्ट झाले की कोविड – 19 व्हॅक्सीन केवळ सुरक्षितच नाही तर अल्पावधित मृत्यूदर रोखण्यासाठी सुरक्षित आहे.

असे झाले संशोधन

या संशोधनाच्या टीमने ऑगस्ट 2021 आणि ऑगस्ट 2022 दरम्यान जीबी पंत रुग्णालयात दाखल 1,578 हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांचा अभ्यास केला. एकूण रुग्णांपैकी 69 जणांनी लसी घेतल्या होत्या. तर 31 टक्के रुग्णांनी कोविडची लस घेतली नव्हती. लसी घेतलेल्यांपैकी 96 रुग्णांनी दोन्ही लसी घेतलेल्या होत्या. तर 4 टक्के लोकांनी एकच लस घेतली होती. त्यातील 92.3 टक्के जणांनी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशील्ड लस घेतली होती. तर 7.7 टक्के रुग्णांनी हैदराबादच्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस घेतली होती.

इतरही कारणे मृत्यूस जबाबदार

या संशोधनात लसीकरणाचा हार्ट अटॅकशी काहीही संबंध असल्याचे स्पष्ट झाले नाही. केवळ दोन टक्के हार्ट अटॅक लसी घेतल्यानंतर पहिल्या 30 दिवसात आले होते. तर बहुतांशी हार्ट अटॅक लसी घेतल्यानंतर 90-270 दिवसात आले. हार्ट अटॅक आलेल्या 1,578 रुग्णांपैकी 13 टक्के रुग्णांचा सरासरी 30 दिवसात मृत्यू झाला. त्यापैकी 58 टक्के लसी घेतलेले होते. तर 42 टक्के लस न घेतलेले होते. या रुग्णांना आधीच असलेल्या आजारांचा विचार करता लसी घेतलेल्याचा 30 दिवसात मृत्यूची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होती. वाढते वय, मधुमेह आणि धूम्रपान यांचा 30 दिवसांतील मृत्यूशी जास्त संबंध आढळला आहे.

आयसीएमआरचेही संशोधन सुरु 

30  दिवस ते सहा महिन्यात 75 रुग्णांचा मृत्यू झाला, त्यातील 43.7 टक्के रुग्णांचे लसीकरण झाले होते. परंतू इतर आजारांचा विचार करता लसीकरणाने झालेल्या मृत्यूदराची शक्यता फार कमी आढळली. आता आयसीएमआर देखील कोविड-19 साथीनंतर तरुणांच्या हृदय विकाराने अचानक झालेल्या मृत्यूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करीत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.