AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vitamin : या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे येतात घाणेरडे विचार, कोणते जीवनसत्त्व ते जाणून घ्या

Dirty Thoughts : कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे घाणेरडे अथवा नकारात्मक विचार मनात येतात हे तुम्हाला माहिती आहे का? जर सतत असे नकारात्मक विचार येत असतील तर हे व्हिटामिन्स घेऊन तुम्ही असे येणारे विचार थांबवू शकता.

Vitamin : या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे येतात घाणेरडे विचार, कोणते जीवनसत्त्व ते जाणून घ्या
ते व्हिटामिन कोणते
| Updated on: Nov 01, 2025 | 4:13 PM
Share

Vitamin B12 Deficiency Symptoms: शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि मिनरल्सची गरज भासते. यामुळे शरीरच तंदुरुस्त होते असे नाही तर तुमचे मन, मूड आणि डोके पण शांत आणि नियंत्रित राहते. यातील एका व्हिटामिन्सची कमतरता जर सतत जाणवत असेल तर मग मन अशांत होते. टक्कूरं काम करत नाही. डोक्यात भनभन सुरु होते. अनेक वेळा आपली नाहक चिडचिड होत असल्याचे. अस्वस्थ वाटत असल्याची जाणीव आपल्याला होते. आपण मित्राकडे जरी गेलो तरी आपले मन कशातच रमत नसल्याचे जाणवते. हे सर्व व्हिटामिन बी12 (Vitamin B12) च्या कमतरतेमुळे घडते.

हे जीवनसत्व शरीरात रक्त पेशी तयार करण्यासाठी, डीएनए तयार करण्यासाठी आणि नर्व्हस सिस्टिम मजबूत करण्यासाठी मदत करते. जर शरीरात बी 12 ची कमतरता असेल तर त्याचा शरिरावरच नाही तर मनावरही मोठा परिणाम होतो. अनेकदा लोकांची चिडचिड वाढते. ते निराश होतात. त्यांच्यात नैराश्य वाढते. त्यांच्यात नकारात्मक विचार वाढतात. सोबतच घाणेरडे विचारही येतात. जर तुम्हाला पण असेच होत असेल, मानसिक थकवा जाणवत असेल तर ही सर्व लक्षणं व्हिटामिन बी12 च्या कमतरतेची असल्याचे समजून जा.

का येतात तसले विचार?

व्हिटामिन बी12 च्या कमतरतेमुळे डोक्यात नकारात्मकच नाही तर घाणेरडे विचारही येतात. (Which vitamin deficiency causes dirty or negative thoughts in the mind) व्हिटामिन बी12 केवळ शरीरालाच ताकद देते असे नाही तर डोकेही शांत ठेवते. मानसिक थकवा नाहीसा करते. मेंदुत असलेले हॅप्पी हर्मोन्स, सेरोटोनिन आणि डोपामिन संतुलित ठेवते. जेव्हा या व्हिटामिनची कमतरता भासते. तेव्हा मेंदुत हे हर्मोन्स तयार होत नाहीत. त्यामुळे व्यक्तीची चिडचिड वाढते. त्याला अस्वस्थ वाटते. त्याचे कुठेच आणि कशातच मन लागत नाही. त्यालाही जाणवते की आपण असे विचित्र का वागत आहोत. तर त्याचे उत्तर हे व्हिटामिन बी12 ची कमतरता हेच आहे.

व्हिटामिन बी12 कमतरतेचा परिणाम काय?

या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे नेहमी थकवा आणि सुस्ती राहते

  • श्वास घेण्यास नेहमी त्रास होतो. चक्कर येतात.
  • धमण्या कमकुवत जाणवतात. मान आणि पाठीमध्ये दुखते
  • हातपायामध्ये मुंग्या जाणवतात
  • कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नाही. स्मरणशक्ती कमकुवत होते

व्हिटामिन बी12 साठी काय खावे?

व्हिटामिन बी12 वाढवण्यासाठी काय खावे (What to eat to increase vitamin B12 naturally) ते पाहुयात. जर तुम्ही मासांहारी असाल तर चिकन, अंडे आणि मासे यांचा जेवणात समावेश करु शकता. जर तुम्ही शाकाहारी असाल तर दूध, दही आणि पनीर यांचा वापर करू शकता. फोर्टिफाइड सीरियल्स, सोया मिल्क आणि न्यूट्रिशनल यीस्ट हे खाणे पण फायदेशीर ठरू शकते.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.