AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRCTC : इच्छा नसताना ट्रेनमध्ये घ्यावे लागेल जेवण? आयआरसीटीसी ने गुपचूप केला तो मोठा बदल

Big Change By IRCTC : रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना एक मनस्ताप सहन करावा लागू शकतो. तिकीट बुक करताना एका गडबडीमुळे इच्छा नसतानाही ट्रेनमध्ये त्यांना जेवण घ्यावे लागण्याची शक्यता आहे. आयआरसीटीसीवर त्यामुळे प्रवाशी भडकले आहेत.

IRCTC : इच्छा नसताना ट्रेनमध्ये घ्यावे लागेल जेवण? आयआरसीटीसी ने गुपचूप केला तो मोठा बदल
आयआरसीटीसीचा दणका
| Updated on: Nov 01, 2025 | 11:04 AM
Share

Train, Railway Food : वंदे भारत, शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना खिशाला भूर्दंड बसणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) गुपचूपपणे एक मोठा बदल केला आहे. ट्रेनेच्या तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. यामध्ये “नो फूड ऑप्शन” विना जेवण तिकीट बुक करण्याचा पर्याय हटवला आहे. या निर्णयामुळे प्रवाशी नाराज झाले आहेत. कारण त्यांना आता इच्छा नसतानाही रेल्वेतील जेवणासाठी 300 ते 400 रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावे लागतील.

नो मीलचा पर्याय हटवला

यापूर्वी ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना “नो मील” वा “नो फूड” हा पर्याय निवडण्याची मुभा होती. ज्यांना रेल्वे प्रवासादरम्यान जेवणाची गरज नााही. त्यांना हा पर्याय निवडता येत होता. पण आता आयआरसीटीसीची साईट अथवा ॲपवर ही सुविधा दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांना गरज नसताना भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यांना जेवणाचा प्रकार, शाकाहारी, मांसाहारी आणि जैन पद्धतीच्या जेवणाची निवड करावी लागत आहे.

प्रवाशांमध्ये नाराजी

प्रवाशांनी सोशल मीडियावर या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे अनेक प्रवाशांनी एक्सवर त्यांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अगदी गुपचूपपणे आयआरसीटीसीने हा सगळा प्रकार केल्याचा दावा प्रवाशी करत आहेत. तिकीट बुक करताना त्यांना आता माहिती न देताच जेवणाचे पैसे वसूल केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.एका प्रवाशाने ट्वीट केले आहे की मी केवळ तीन तासांसाठी प्रवास करणार आहे. तरीही मला जेवणासहीत तिकीट खरेदी करावे लागले. हा प्रवाशांच्या खिशावर दरोडा आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, नो फुडचा पर्याय पूर्णपणे हटविण्यात आलेला नाही. तर त्याची जागा बदलवण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, हे जेवण ऑप्ट आऊट करण्याचा पर्याय त्याच पेजवर आहे. थोड बारकाईने पाहिल्यास हा पर्याय दिसतो. पण प्रवाशांना हा पर्याय लवकर समोर येत नसल्याने नाराजी पसरली आहे. त्यांनी रेल्वे प्रशासनावर तोंडसुख घेतले आहे. ही प्रवाशांची फसवणूक असल्याचा दावा प्रवाशी करत आहेत. लवकर हा पर्याय पूर्वीच्या ठिकाणी आणण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा