AC Side Effects : दिवसभर खाता एसीची हवा ? व्हा सावध, या गंभीर आजारांना बळी पडू शकता

उन्हाळा सुरू होताच एसीचा वापर दणादण वाढतो. पण जास्त काळ एसीचा वापर केल्याने केवळ आरोग्याच्या नव्हे कर त्वचेच्या पण समस्या उद्भवू शकतात. एसीच्या अतीवापराचे दुष्परिणाम जाणून घेऊया.

AC Side Effects : दिवसभर खाता एसीची हवा ? व्हा सावध, या गंभीर आजारांना बळी पडू शकता
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 1:43 PM

नवी दिल्ली : वाढत्या तापमानासह उन्हाळ्याचे (summer) आगमन झाले आहे. बदलत्या हवामानासोबत आता आपली जीवनशैलीही बदलत आहे. बदलत्या ऋतूने खाण्यापिण्यापासून ते पेहरावापर्यंत सर्व काही बदलले आहे. थंडीचे उबदार कपडे, ब्लँकेटस, हिटर आता कपाटात परत गेले असून साधे, सुती कपडे घालण्याचा, माठातील पाणी (cold water in Matka) पिण्याचा ऋतू आला आहे. अशा परिस्थितीत उन्हाळा येताच लोकांनी एसीचा (AC) वापर सुरू केला आहे. या ऋतूमध्ये दिवसभर एसीतच राहणारे अनेकजण असतात.

कडाक्याच्या उन्हामुळे लोकांना एसीपासून थोडा वेळही दूर राहता येत नाही. पण एसीचा सतत वापर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का ? त्यामुळे केवळ आपल्या आरोग्यावरच नव्हे तर त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. एसीच्या अतिवापरामुळे होणाऱ्या पाच गंभीर समस्यांबद्दल जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

डिहायड्रेशन

जल हे जीवन आहे. पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते, हे सर्वांनाच माहीत असते. त्याचे पुरेशा प्रमाणात सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. तसेच शरीरातील अनेक कार्य सुरळीत चालण्यासाठीही पुरेशा प्रमाणात पाणी पिणे महत्वाचे असते. पण उन्हाळ्यात अनेक लोक कमी पाणी पितात व त्यांना डिहायड्रेशनचा त्रासही होऊ लागतो. पण तुम्हाला माहित आहे का की ही समस्या फक्त पाण्याच्या कमतरतेमुळेच नाही तर एसीच्या अतिवापरामुळे देखील होऊ शकते. खरं तर, ज्या खोलीत एसी जास्त वापरला जातो, त्या खोलीतील वातावरणातील आर्द्रता सुकते, ज्यामुळे शरीराचे निर्जलीकरण होऊ लागते.

अस्थमा

जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर सतत एसी वापरणे तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे. वास्तविक, एसीची योग्य स्वच्छता न केल्यामुळे, त्यातील धुळीमुळे दम्याचा त्रास वाढू शकतो. इतकेच नाही तर एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने नाकाचा पॅसेजही कोरडा होतो, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

डोकेदुखी

जर तुम्ही दिवसभर एसी सतत वापरत असाल तर त्यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. खरंतर, वातानुकूलित खोली आणि बाहेरचे तापमान यात खूप फरक असतो. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही एसीमुळे झालेल्या थंड वातावरणातून बाहेरील गरम तापमानात जाता तेव्हा डोकेदुखी होऊ शकते. हे विशेषतः मायग्रेनच्या रुग्णांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते.

कोरडी त्वचा

एसीचा अतिरेक आपल्या आरोग्यावर तर वाईट परिणाम करतोच पण त्यामुळे आपल्या त्वचेवरही विपरीत परिणाम होतो. वास्तविक, एसी सतत सुरू राहिल्यामुळे त्या खोलीतील आणि वातावरणातील आर्द्रता कमी होऊ लागते, त्यामुळे आपली त्वचाही कोरडी होते. एवढेच नाही तर एसीच्या वापरामुळे केस आणि डोळेही कोरडे होतात. ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होऊ लागते तसेच केसगळतीही सुरू होऊ शकते.

मेंदूवर वाईट परिणाम

जर तुम्ही सतत एसी वापरत असाल तर त्याचा तुमच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. वास्तविक, एसीच्या अत्यंत कमी तापमानामुळे मेंदूच्या पेशी आकुंचन पावू लागतात. त्यामुळे मेंदूची क्षमता आणि कार्यप्रणाली प्रभावित होते. यासोबतच सतत एसीत बसल्यामुळे चक्कर येण्याचा त्रासही अनेकांना होतो.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.