AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारंवार तोंड कोरडे पडणे असू शकते ‘या’ गंभीर आजाराचे लक्षण

हवामान उष्ण असताना पुन्हा पुन्हा तहान लागणे साहजिकच आहे, परंतु सामान्य हवेतही घसा कोरडा पडत असेल तर सावध व्हायची गरज आहे. पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच पुन्हा तहान लागणे हे हायपरग्लायसेमियाचेही लक्षण असू शकते.

वारंवार तोंड कोरडे पडणे असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 14, 2023 | 12:10 PM
Share

नवी दिल्ली – सध्याच्या व्यस्त जीवनात अनेक वेळा आपण शरीरातील लहान-सहान बदलांकडे दुर्लक्ष करतो, मात्र ते पुढे एखाद्या मोठ्या, गंभीर आजारात बदलू शकते. तोंड वारंवार कोरडे पडणे (dry mouth) आणि अचानक तहान (thirst)  वाढणे हीदेखील अशीच लक्षणे आहेत. हवामान उष्ण असताना पुन्हा पुन्हा तहान लागणे साहजिकच आहे, परंतु सामान्य हवेतही घसा कोरडा पडत असेल तर सावध व्हायची गरज आहे. हे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे आपण सावध होणे महत्वाचे आहे. रक्तातील साखर वाढण्याला हायपरग्लायसेमियाही (Hyperglycemia)म्हटले जाते.

जर तुम्हाला हाय ब्लड शुगरबद्दल माहिती नसेल तर ते शरीरातील इतर अनेक आजारांचे कारण बनू शकते. हाय ब्लड शुगरकडे दुर्लक्ष करणे ही एक मोठी चूक ठरू शकते. तोंड सतत कोरडे पडणे, तहान वाढणे, तसेच वारंवार लघवी होणे, हे सर्व हायपरग्लायसेमियाचे लक्षण असू शकते. याशिवाय, अशी अनेक लक्षणे आहेत ज्याद्वारे हा आजार ओळखला जाऊ शकतो.

हाय ब्लड शुगर असताना दिसतात ही लक्षणे

रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे हा मधुमेहावरील उपचाराचा उद्देश असतो. पण कधीकधी मधुमेह असूनही हाय ब्लड शुगरचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, तुम्ही योग्य वेळी हायपरग्लाइसेमिया ओळखून त्यावर उपचार करणे महत्वाचे ठरते. काहीवेळा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे हा फारसा चिंतेचा विषय ठरत नाही, पण ही स्थिती वारंवार उद्भवू लागल्यास आरोग्याबाबत सावध व्हायची गरज आहे. कधीकधी ही स्थिती प्राणघातक देखील ठरू शकते.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. अशा स्थितीत अनेक लोकांना जास्त तहान लागते आणि तोंड वारंवार कोरडे पडते, तर काही लोकांना वारंवार लघवी लागते. याशिवाय इतरही अनेक लक्षणे दिसू शकतात:

– थकवा जाणवणे

– अस्पष्ट दिसणे

– कोणत्याही प्रतयत्नांशिवाय अचानक वजन कमी होणे

– स्किन इन्फेक्शन

– ब्लॅडर इन्फेक्शन

या कारणांमुळे वाढू शकते रक्तातील साखर

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यास अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. सर्वसाधारणपणे, जीवनशैली आणि अन्न हे त्यात महत्वाचे घटक ठरतात. यासोबतच इतरही अनेक कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

– ताण

– एखाद्या आजारामुळे

– गरजेपेक्षा जास्त खाणे

– व्यायामाचा अभाव

– डिहायड्रेशन

– मधुमेहाशी निगडीत औषधे न घेणे

Follow Us
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंचं भाषण...
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा