मुंबई : आपल्या सर्वांनाच चमकदार, चवदार आणि चकमकीत पदार्थ (Food) खायला आवडतात. त्यामध्येही भाजी, भात, पोळी, पराठे काहीही असो मीठ हे व्यवस्थित लागते. आपल्यापैकी बरेच लोक असतील त्यांना पदार्थांमध्ये मीठ (Salt) कमी झालेले अजिबात आवडत नसेल. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मिठामुळे जेवण चवदार बनत असले तरी त्याचे अतिसेवन शरीरासाठी अत्यंत धोकादायक (Dangerous) आहे. असे म्हटले जाते की मिठाच्या अतिसेवनाने हृदयविकार होऊ शकतो. त्यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे हृदयविकाराचा झटका. एवढेच नाही तर भाज्या किंवा इतर पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्याने हाडे दुखू शकतात. मात्र, अतिप्रमाणात मीठ खाणे टाळाच.