AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care | तुम्हाला वारंवार तहान लागतेय? ‘या’ गंभीर आजाराचेही असू शकते लक्षण

सध्या एप्रिल सुरु आहे. जवळपास सर्वच शहरांमध्ये उन्हाचा पारा चढला आहे. या दिवसांमध्ये वारंवार तहान लागणे अगदी सामान्य आहे. उन्हाळ्यात ‘डिहायड्रेशन’ची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे पाण्याची तहानही खूप लागते पण काही वेळा पाणी प्यायल्यानंतरही पुन्हा पुन्हा तहान लागल्यास हे एखाद्या गंभीर आजाराचेही लक्षण असू शकते.

Health Care | तुम्हाला वारंवार तहान लागतेय? ‘या’ गंभीर आजाराचेही असू शकते लक्षण
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 11, 2022 | 10:30 AM
Share

मुंबई : तीव्र उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. सूर्य प्रचंड तापत असल्याने सर्वांच्याच जिवाची लाहीलाही होत आहे. दुपारच्या वेळी सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने अनेक जण दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहे. सकाळी किंवा सायंकाळीच आपले काम करण्याचा बेत आखत आहेत. उन्हाळ्यात घसा कोरडा होणे आणि सतत तहान लागणे ही अगदी सामान्य बाब आहे. काही वेळा वारंवार तहान (thirsty) लागण्यामागे आपण केलेले जेवणदेखील कारणीभूत असू शकते. उदा. जास्त तुपाचे अन्नघटक खाल्ल्यास किंवा वरणाचे जेवण केल्यावरही वारंवार तहान लागणे शक्य असते. याचा सरळ अर्थ तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे, जेणेकरून ‘डिहायड्रेशन’ची (dehydration) समस्या टाळता येईल. परंतु काही वेळा ही एक सामान्य बाब ठरत नाही. घसा वारंवार कोरडा पडणे आणि पाण्याची जास्त तहान लागण, हे एखाद्या मोठ्या आजाराचेही लक्षण (symptom) असू शकते. पाणी प्यायल्यानंतरही तुम्हाला वारंवार तहान लागत असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

रुग्णांना ज्यावेळी अशी समस्या जाणवेत तेव्हा डॉक्टर पहिल्यांदा मधुमेहाची चाचणी करण्याचा सल्ला देतात. कारण हे लक्षण मधुमेहाच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. परंतु जर तुमची मधुमेहाची चाचणी योग्य असेल आणि तरीही तुम्हाला ही समस्या भेडसावत असेल तर तुम्ही थोडा खोलवर विचार करून या मागील कारण शोधले पाहिजे. पाणी पिऊनही वारंवार तहान लागणे हे आतड्यांसंबंधी काही गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. वारंवार तहान लागण्याचे एक कारण म्हणजे आतड्याचा कर्करोग असू शकते.

आतड्यांचा कर्करोग शरीरात खूप हळू वाढतो. त्याची लक्षणे बऱ्याच दिवसांनी दिसतात. याचे लवकर निदान झाले तर या गंभीर आजाराचा धोका टळू शकतो. आतड्यांच्या कॅन्सरमध्ये अनेक लक्षणे दिसतात. यात, दुखणे, थकवा जाणवणे, भूक न लागणे, वजन कमी होणे आदींचा समावेश असतो. हा कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरल्यास ‘हायपरक्लेसेमिया’ होऊ शकतो. जेव्हा खराब झालेल्या हाडांमधून कॅल्शिअम रक्तात सोडले जाते तेव्हा असे होत असते.

आतड्यांच्या कर्करोगाची लक्षणे

  1. आतड्यांच्या कार्यात बदल होणे.
  2. पोट साफ करताना रक्त येणे.
  3. पोटदुखी, अस्वस्थता आणि सूज येणे.
  4. बद्धकोष्ठता.
  5. गुद्द्वार आणि गुदाशयभोवती ढेकूळ .
  6. वजन कमी होणे.
  7. लघवीतून रक्त येणे, वारंवार लघवीला जाणे.

ही आहेत कारणे

  1. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या आजाराची शक्यता वाढते.
  2. रेड मीट किंवा प्रक्रिया केलेले मांस खाणे आणि कमी फायबरयुक्त आहार घेतल्यास आतड्यांचा कर्करोग होउ शकतो.
  3. जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ लोकांमध्ये या कर्करोगाचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो.
  4. जे लोक जास्त मद्यपान करतात त्यांना आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
  5. ज्यांच्या पालकांना हा आजार झाला आहे, अशा लोकांच्या मुलांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो.

संबंधित बातम्या :

भारतातील पहिली एक्स्टेन्डेड रिअॅलिटी लॅब सुरू, कॅन्सरवर होणार आधुनिक उपचार

तुमच्याही शहरात हवेचे प्रदूषण वाढलेय? या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता…

Tumor : अग्नाशयापासून थेट नसांपर्यंत पसरला ट्यूमर… मग झाले असे काही की…

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं