AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tumor : अग्नाशयापासून थेट नसांपर्यंत पसरला ट्यूमर… मग झाले असे काही की…

त्यांचा ट्यूमर शरीरातील अनेक भागांपर्यंत पोहचून गेला होता. आता काय करावे समजत नव्हते... सामान्य सर्जरीने या ट्यूमरला काढून टाकणे शक्य नव्हते. मग तेव्हा डॉक्टरांनी एक विशेष प्रयत्न करुन एक शस्त्रक्रिया केली. सात तासांपर्यंत चाललेल्या या शस्त्रक्रियेने रुग्णाचे प्राण वाचवण्यास अखेर यश आले.

Tumor : अग्नाशयापासून थेट नसांपर्यंत पसरला ट्यूमर... मग झाले असे काही की...
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: tv9
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Apr 03, 2022 | 8:17 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतात कॅन्सरचा (Cancer) विळखा वाढताना दिसून येत आहे. अनेकाना आपल्याला कॅन्सर आहे, हे खूप उशिराने समजते तोपर्यंत हातातील बरीच वेळ निघून गेलेली असते. कोरोना काळात तर कॅन्सरग्रस्त रुग्णांचे प्रचंड हाल बघायला मिळाले होते. आधीच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असल्याने त्यात बाहेरील संधिसाधू आजारांविरुद्ध लढावे लागत असते. कॅन्सर निर्माण करणारा ट्यूमर शरीरातील कुठल्याही अवयवाला हानी पोहचवू शकतो. परंतु जर हा ट्यूमर शरीरातील अन्य भागांमध्ये तसेच नसांमध्ये पसरल्यास हे प्रकरण जिवावर बेतू शकते. असेच एक प्रकरण वैशाली येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये समोर आले आहे. या ठिकाणी डॉक्टरांनी कॅन्सच्या उपचारातील सर्वात दुर्मीळ अशी सर्जरी केली. यात, एक ॲप्पलबाय प्रक्रियेव्दारे ५४ वर्षीय शिक्षिकेचे प्राण वाचवण्यास डॉक्टरांना यश आले आहे. महिलेच्या अग्नाशयात (pancreas) एक मोठा ट्यूमर (tumor) होता. जो रक्तनलिकांपर्यंत पोहोचला होता. महिलेवर तब्बल सात तास शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. विवेक मंगला यांच्या नेतृत्वात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

ट्यूमरचं निदान झालं

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिलेला तिच्या पोटाच्या वरील भागात काही तरी गडबड वाटत होती. तसेच त्या भागात वारंवार सूज निर्माण होत होती. महिलेचे वजनदेखील कमी होत होते. काळी काळानंतर तिला अग्नाशयाचा ट्यूमर असल्याचे निदान झाले. हा ट्यूमर लीवरला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांपर्यंत पोहचला होता.

काय असतात शक्यता

शरीरातील बऱ्याच भागापर्यंत हा ट्यूमर पोहचला असल्याने संबंधित महिलेची परिस्थिती अधिकच गंभीर होत होती. महिलेची सर्व तपासणी करण्यात आल्यानंतर तिच्यावर केमोथेरपी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा परिणाम म्हणून ट्युमरचा आकारदेखील काहीसा कमी झाल्याचे डॉक्टरांना जाणवले. परंतु महिलेची बिकट स्थिती बघता हा ट्यूमर संपूर्णपणे काढणे आवश्यक होते. त्यामुळे डॉ. विवेक मंगला यांच्या नेतृत्वात सर्जिकल ऑन्कोलॉजीच्या टीमने ॲप्पलबाय सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. डॉ. मंगला यांनी सांगितले, की ॲप्पलबाय प्रक्रिया पेनक्रियाटीक बॉडी मोठा ट्यूमर झालेल्या रुग्णांसाठी शेवटचा उपाय म्हणून वापरली जात असते. मोठी सर्जरी असली तरी तिला सुरक्षीत मानले जात असते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, निदान करण्यास उशीर झाल्याने साधारणत:कॅन्सर हा शेवटच्या टप्प्यात पोहचत असतो. या वेळी गरजेनुसार केमोथेरपी, रेडियोथेरपीसोबत सर्जरी करण्याचाही सल्ला दिला जात असतो. कॅन्सर पुन्हा होऊ नये, यासाठी ट्यूमरला पूर्णपणे काढले जात असते.

असा असतो अग्नाशयाचा कॅन्सर

डॉक्टरांच्या मते, अग्नाशय आपल्या पचनक्रियेचा एक महत्वपूर्ण हिस्सा आहे. जेव्हा अन्न पोटात जाते तेव्हा अग्नायश पॅनक्रियाटीक रसायन निर्माण करत असत, ज्याच्या माध्यमातून खाल्लेल अन्न पचन होत असत. अग्नाशयाच्या पेशी अनियंत्रित पध्दतीने वाढल्याने ट्यूमरची निर्मिती होत असते. त्याचे नंतर कॅन्सरमध्ये रुपांतर होऊ शकते.

इतर बातम्या

Hariharan Birthday : दोनदा राष्ट्रीय पुरस्कार विजेते, पद्मश्री हरिहरन यांचा जीवनप्रवास…

अग्नाशयापासून थेट नसांपर्यंत पसरला ट्यूमर… मग झाले असे काही की…

IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपवरील आंद्रे ‘राज’ 24 तासांंत गेलं, ईशानने हिसकावली ऑरेंज कॅप, बटलर दुसऱ्या स्थानी

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त