AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air Pollution : वाढत्या प्रदूषणामुळे डॉक्टर देतात मास्क लावण्याचा सल्ला, कोणता मास्क सर्वोत्तम ?

दिल्लीसह मुंबईतही हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. अनेक भागात वायू प्रदूषणाची पातळी वाढत आहे. प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे अनेक प्रकारचे आजार होत आहेत. त्यांच्यामध्ये श्वसनाचे आजार अधिक दिसून येत आहेत. डॉक्टरांनी लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Air Pollution : वाढत्या प्रदूषणामुळे डॉक्टर देतात मास्क लावण्याचा सल्ला, कोणता मास्क सर्वोत्तम ?
Image Credit source: freepik
| Updated on: Nov 01, 2023 | 2:38 PM
Share

Air Pollution and mask : बदलत्या ऋतूनुसार वायू प्रदूषणाची पातळीही वाढू लागते. सध्या दिल्ली आणि मुंबईतदेखील हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाली आहे. काही दिवसांपूर्वी तर मुंबईतील हवेचा दर्जा दिल्लीहून अधिक खराब झाला होता. थंडीला सुरूवात होताच देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागातील AQI चा स्तर खराब होतो. त्यातच आता मुंबईतही हवेची पातळी खराब होऊ लागली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक आजारांचा धोका उद्भवतो. काही लोक आजारीही पडतात.

रुग्णालयांमध्ये दमा आणि ब्राँकायटिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉक्टरांनी लोकांना प्रदूषण टाळण्याचा सल्ला दिला आहे. वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी मास्क घालावेत, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या बाजारात अनेक प्रकारचे मास्क आहेत. पण यापैकी कोणता मास्क चांगला आहे आणि मास्क कधी लावावा ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

डॉक्टर सांगतात की वायू प्रदूषणाची पातळी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. विशेषत: ज्यांना आधीच अस्थमा, सीओपीडी किंवा ब्राँकायटिससारखे आजार आहेत त्यांना अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. वाढत्या प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी फिरायला न जाण्याचा प्रयत्न करावा, तसेच ज्या भागात प्रदूषणाची पातळी जास्त असेल तिथेही जाणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास मास्क घालावा, असा सल्ला डॉक्टर देतात.

मास्कमुळे काय होतं ?

प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी चांगल्या दर्जाचा मास्क वापरला पाहिजे. चांगला मास्क हा हवेतील धोकादायक कण आणि सूक्ष्म कण शरीरात जाण्यापासून रोखतो. मास्क हा बहुतांश प्रदूषण फिल्टर करतो. मास्क विकत घेताना, तो तुमच्या चेहऱ्याला कसा बसतो आणि तो तुमचे नाक आणि तोंड नीट झाकतो की नाही हे देखील तपासले पाहिजे. आपलं तोंड आणि नाक नीट झाकलं जाईल असाच मास्क खरेदी करावा.

कोणता मास्क ठरतो उत्तम ?

वायू प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी एन-95 हा मास्क सर्वोत्तम आहे. या मास्कमध्ये 5 थर असतात. हे हवेतील सुमारे 95 टक्के कण फिल्टर करते. या मास्कमुळे धोकादायक कण शरीरात जात नाहीत. त्यामुळे श्वसनाच्या समस्या टाळता येतात.

मास्क कोणी लावावा ?

वाढत्या प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र, ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांनी मास्क घालणे अत्यावश्यक आहे. बाहेर जाताना मास्क घालावा. नेहमी चांगल्या प्रतीचा मास्क विकत घ्यावा. आणि एकच मास्क अनेक दिवस वापरू नका, असा सल्ला डॉक्टर देतात

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.