AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हालाही उजळ आणि सुंदर त्वचा हवी? या गोष्टींचा असा करा वापर

स्त्रियांच्या सुंदर आणि तेजस्वी त्वचेसाठी गुलाबपाणी, लिंबू, काकडी-दही आणि पपई हे उत्तम घरगुती उपाय आहेत. हे नैसर्गिक घटक त्वचेला पोषण देतात, सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेचा रंग उजळ करतात. रासायनिक पदार्थांपासून मुक्त असलेले हे उपाय नियमित वापरल्यास दीर्घकाळ तरुण आणि निरोगी त्वचा मिळते.

तुम्हालाही उजळ आणि सुंदर त्वचा हवी? या गोष्टींचा असा करा वापर
उजळ आणि सुंदर त्वचेसाठी हा फेसपॅकImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: May 30, 2025 | 1:46 PM
Share

स्त्रिया स्वत:ला सुंदर ठेवण्यासाठी आणि आपली त्वचा तजेलदार ठेवण्याकरिता विविध उपया करतात. त्या नितळ आणि तेजस्वी त्वचा मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. मात्र, बेदरकार जीवनशैली, प्रदूषित हवा आणि सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांमुळे त्वचा रोज खराब होते. यामुळे चेहऱ्याची नैसर्गिक चमक कमी होते आणि सुरकुत्या दिसू लागतात. अशा वेळी वापरण्यात येणारी बहुतेक महागडी सौंदर्य प्रसाधने रसायनांनी भरलेली असतात, ज्याचा दीर्घकालीन वापर तुमच्या त्वचेस हानीकारक ठरू शकतो. त्यामुळे नितळ आणि तरुण त्वचा मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय वापरू शकता, जे कोणत्याही रासायनिक पदार्थांशिवाय तुमच्या त्वचेला निरोगी ठेवू शकतात. हे उपाय नियमित केल्यास तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसू शकता.

गुलाबपाणी

घट्ट आणि चमकदार त्वचेसाठी गुलाबपाण्याचा थोडासा वापर करू शकता. गुलाबपाणी हे चेहऱ्याचे डीप क्लेंझर म्हणून काम करते. हे त्वचेतील मळ, धूळ आणि बंद रोमछिद्र स्वच्छ करते. याशिवाय, डोळ्यांखालील जळजळ कमी करते आणि चेहरा ताजातवाना दिसतो.

गुलाबपाणी कसे वापरावे?

एका बाउलमध्ये 2 चमचे गुलाबपाणी, थोडेसे ग्लिसरीन आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा.

हे मिश्रण कॉटनच्या साहाय्याने चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त गुलाबपाणी लावले तरीसुद्धा आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात.

लिंबाचा रस

लिंबूमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. हे अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतात. हे त्वचेवर सुरकुत्या, डाग, लहान रेषा आणि फिकटपणा दूर करण्यात मदत करते. शिवाय, लिंबू त्वचेला नैसर्गिकरित्या फिकट आणि उजळ बनवते.

लिंबाचा रस कसा वापरावा?

लिंबाचा रस काढून चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा.

15 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

काकडी आणि दही

ताजीतवानी आणि तरुण त्वचा मिळवण्यासाठी नियमितपणे एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. दही आणि काकडीचे मिश्रण त्वचेचे एक्सफोलिएशन करते आणि मृत त्वचा दूर करते. दह्यात लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचा स्वच्छ करते आणि काकडीने त्वचेला शांती मिळते.

कसे वापरावे?

अर्धा कप दही आणि 2 चमचे किसलेली काकडी मिक्स करा.

चेहऱ्यावर 20 मिनिटांसाठी लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

पपई

चमकदार त्वचेसाठी पपई खूप फायदेशीर आहे. ही फळे व्हिटॅमिन A ने भरलेली असून ती अँटीऑक्सिडंट्सप्रमाणे कार्य करते आणि त्वचेला तरुण व निरोगी ठेवते. पपईमध्ये एक एंजाइम असतो जो त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो आणि त्यामुळे त्वचा मऊ व गुळगुळीत दिसते.

कसे वापरावे?

काही पपईचे तुकडे घेऊन त्याची पेस्ट करा.

चेहऱ्यावर आणि गळ्यावर 15 मिनिटांसाठी लावा.

नंतर कोमट पाण्याने धुवा.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.