AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा कापताना डोळ्यातून येणार नाही पाण्याचा एकही थेंब, ‘या’ टिप्स येतील उपयोगी!

आता आपण काही अशा गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे कांदा चिरत असताना आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही.

कांदा कापताना डोळ्यातून येणार नाही पाण्याचा एकही थेंब, 'या' टिप्स येतील उपयोगी!
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 18, 2023 | 12:19 AM
Share

मुंबई : आपण कांदा चिरत असता डोळ्यात पाणी येतेच. त्यामुळे बहुतेक लोकांना कांदा चिरणे हे काम अवघड वाटते. तर डोळ्यात पाणी येते म्हणून काही लोक कांदा चिरायचं टाळतात. तर आता आपण काही अशा गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे कांदा चिरत असताना आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही.

1. सगळ्यात आधी कांदा नीट सोलून घ्या. त्यानंतर कांद्याचे दोन तुकडे करा. हे तुकडे 15 ते 20 मिनिटे पाण्यात टाकून ठेवा. तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल तर त्या पाण्यात तुम्ही ते टाकू शकता. यामुळे कांद्यातील एन्झाइम्स बाहेर पडते आणि तो चिरताना डोळ्यात पाणीही येत नाही.

2. कांदा चिरत असताना तो धारदार चाकूने चिरा. कारण धारदार चाकूने कांदा चिरला की कांद्याचा थर कापला जातो. तसंच यामुळे कांद्यातील एन्झाइम्स बाहेर पडते. त्यामुळे कांदा चिरताना डोळ्यात पाणी यायचं थांबतं.

3. जर कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर, कांदा चिरण्यापूर्वी तो 20 ते 25 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे कांद्यातील एन्झाइम्सचा प्रभाव कमी होतो आणि यानंतर कांदा चिरल्यानंतर डोळ्यांना त्रासही होत नाही.

4. कांदा चिरत असताना तुम्ही गॉगलचा देखील वापर करू शकता. पण हा असा गॉगल असतो जो डोळ्यांपर्यंत हवा येऊ देत नाही. त्यामुळे कांदा चिरताना अशा प्रकारचा गॉगल वापरल्यास तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही.

5. तसंच कांदा कापण्याअगोदर आपण त्याची सालं काढून टाकतो. तर या काढलेल्या सालांपैकी एक किंवा दोन सालं घ्या आणि ती कांदा कापताना तुमच्या डोक्यावर ठेवा. यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी यायचं थांबेल.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.