AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा कापताना डोळ्यातून येणार नाही पाण्याचा एकही थेंब, ‘या’ टिप्स येतील उपयोगी!

आता आपण काही अशा गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे कांदा चिरत असताना आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही.

कांदा कापताना डोळ्यातून येणार नाही पाण्याचा एकही थेंब, 'या' टिप्स येतील उपयोगी!
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 18, 2023 | 12:19 AM
Share

मुंबई : आपण कांदा चिरत असता डोळ्यात पाणी येतेच. त्यामुळे बहुतेक लोकांना कांदा चिरणे हे काम अवघड वाटते. तर डोळ्यात पाणी येते म्हणून काही लोक कांदा चिरायचं टाळतात. तर आता आपण काही अशा गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे कांदा चिरत असताना आपल्या डोळ्यात पाणी येणार नाही.

1. सगळ्यात आधी कांदा नीट सोलून घ्या. त्यानंतर कांद्याचे दोन तुकडे करा. हे तुकडे 15 ते 20 मिनिटे पाण्यात टाकून ठेवा. तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल तर त्या पाण्यात तुम्ही ते टाकू शकता. यामुळे कांद्यातील एन्झाइम्स बाहेर पडते आणि तो चिरताना डोळ्यात पाणीही येत नाही.

2. कांदा चिरत असताना तो धारदार चाकूने चिरा. कारण धारदार चाकूने कांदा चिरला की कांद्याचा थर कापला जातो. तसंच यामुळे कांद्यातील एन्झाइम्स बाहेर पडते. त्यामुळे कांदा चिरताना डोळ्यात पाणी यायचं थांबतं.

3. जर कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर, कांदा चिरण्यापूर्वी तो 20 ते 25 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे कांद्यातील एन्झाइम्सचा प्रभाव कमी होतो आणि यानंतर कांदा चिरल्यानंतर डोळ्यांना त्रासही होत नाही.

4. कांदा चिरत असताना तुम्ही गॉगलचा देखील वापर करू शकता. पण हा असा गॉगल असतो जो डोळ्यांपर्यंत हवा येऊ देत नाही. त्यामुळे कांदा चिरताना अशा प्रकारचा गॉगल वापरल्यास तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही.

5. तसंच कांदा कापण्याअगोदर आपण त्याची सालं काढून टाकतो. तर या काढलेल्या सालांपैकी एक किंवा दोन सालं घ्या आणि ती कांदा कापताना तुमच्या डोक्यावर ठेवा. यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी यायचं थांबेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.