AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीरात ‘या’ गोष्टीची कमतरता असल्यास थंडीच्या दिवसात हाता-पायांची बोटं पडतात निळी

तुमच्या शरीरात या गोष्टीची कमतरता जाणवल्यास हाताच्या आणि पायांची बोटं जेव्हा थंड हवेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचा धमन्या आकुंचन पावतात. त्यामुळे बोटांना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे हाता-पायांची बोट निळी पडतात. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की शरीरात कोणत्या गोष्टींची कमतरता असल्यास ही समस्या सतावते?

शरीरात 'या' गोष्टीची कमतरता असल्यास थंडीच्या दिवसात हाता-पायांची बोटं पडतात निळी
Fingers and Toes Turning Blue
| Edited By: | Updated on: Dec 12, 2025 | 10:44 PM
Share

हिवाळा सुरू होताच अनेक हंगामी आजार आपल्याला सतावू लागातात. अशातच आपण आपल्या आहारात हंगामानुसार बदल करत असतो जेणेकरून आपले शरीर तंदूरस्त राहील. पण कधी कधी हिवाळा ऋतू सुरू झाला की वातावरणात गारवा वाढतो आणि यामुळे अनेक लोकांची बोटं अचानक पांढरे, निळी किंवा जांभळ्या रंगाचे होतात. यासोबत हाता-पायांच्या बोटांना मुंग्या येणे, वेदना आणि सूज येते. लोकं अनेकदा याला सामान्य सर्दी असेल असं म्हणून दुर्लक्ष करतात , परंतु हे रेनॉड सिंड्रोमचे लक्षण असू शकते. ही समस्या विशेषतः 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये दिसून येते.

विशेषतः जी लोकं गरम आणि थंड पाण्यात बराच वेळ काम करतातकिंवा थंड वातावरणात बराच वेळ बाहेर राहून काम करतात त्यांच्याही हाता-पायांची बोटं सुन्न आणि काळी निळी पडतात. तर थंडीत हाता -पायांची बोटं निळी पडण्याचे कारण काय आहे ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

थंडीत बोटं निळी का होतात?

रेनॉड सिंड्रोममध्ये जेव्हा तुमच्या हातां व पायांच्या बोटांचा संर्पक जेव्हा थंडीच्या दिवसात थंड पाण्यात व थंडीच्या संपर्कात आल्यावर बोटांमधील धमन्या आकुंचन पावतात. त्यामुळे बोटांना शुद्ध रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अशातच जेव्हा ऑक्सिजनची कमतरता जाणवल्यास प्रथम बोटं पांढरी, नंतर निळी आणि नंतर लाल होतात. रक्ताभिसरण थांबले की बोटं सुन्न होतात, बोटांची जळजळ होते आणि वेदना होतात. शिवाय असे जर वारंवार घडले तर बोटांवर जखमा देखील तयार होऊ शकतात. ही समस्या अचानक ताणामुळे देखील उद्भवू शकते आणि काही लोकांना 60 ते 70 अंश फॅरेनहाइटच्या मध्यम थंड तापमानात देखील लक्षणे जाणवू लागतात .

कोणत्या लोकांना सर्वात जास्त धोका आहे?

हॉटेल आणि केटरिंग उद्योगातील लोकं , व्हाइब्रेटिंग टूल्स वापरणे कामगार , वारंवार गरम आणि थंड पाण्याच्या संपर्कात हात ठेवणारे आणि घरकाम करणाऱ्या महिला अशा सर्वांना थंडीच्या दिवसात बोटं निळी पडण्याचा धोका सर्वाधिक असतो. डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात हॉस्पिटलमध्ये बोटांची ही समस्या सतावल्यास सुमारे 60 टक्के रुग्ण येतात. जर थंडीच्या दिवसात हाता पायांची बोटं निळी पडल्यास त्यावर दुर्लक्ष केल्याने बोटं काळेही पडू शकतात आणि यामुळे बोटांच्या ऊतींचे नुकसान होऊ शकते.

हे कसे रोखायचे?

रेनॉडचा संसर्ग टाळण्यासाठी खूप थंड पाण्यात काम न करण्याचा प्रयत्न करा, घरात अनवाणी चालणे टाळा, रेफ्रिजरेटरमध्ये हात ठेवणे किंवा त्याच्या समोर उभे राहणे टाळा . शिवाय डिटर्जंट किंवा कपडे धुण्याचा साबण थेट हातांना लावणे टाळा, लोकरीचे हातमोजे आणि मोजे घाला आणि भांडी धुताना नेहमी रबरचे हातमोजे घाला. सुरुवातीला रेनॉडचा आजार औषधाने बरा होऊ शकतो , परंतु काही प्रकरणांमध्ये, बायोफीडबॅक तंत्रांचा वापर करून हातांचे तापमान नियंत्रित केले जाते . जर औषधांनी आराम मिळत नसेल, तर समस्या आणखी बिकट झाल्यास शस्त्रक्रिया करण्याचीही गरज भासू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा