AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस्ट्रिक कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर खावीत ही फळं

सकाळचे जेवण उशीरा करणे किंवा नाश्ता न करणे यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि भविष्यात तुम्हाला गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.

गॅस्ट्रिक कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर खावीत ही फळं
गॅस्ट्रिक कॅन्सरपासून वाचवतील ही फळंImage Credit source: Freepik
| Updated on: Dec 17, 2022 | 4:56 PM
Share

नवी दिल्ली – थंडीच्या दिवसात गॅस किंवा गॅस्ट्रिक (gastric problem) समस्या होणे हे खूप कॉमन आहे. आजकाल बहुतांश व्यक्तींना हा त्रास होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी (bad food habits) आणि व्यस्त लाइफस्टाइलमुळे हा त्रास होतो. मात्र ही सवय जास्त दिवस राहिल्यास ॲसिडिटीमुळे गॅस्ट्रिक कॅन्सरचा (gastric cancer) धोका वाढतो. सकाळचे जेवण उशीरा करणे किंवा नाश्ता न करणे यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि भविष्यात तुम्हाला गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.

महिला होतात अधिक प्रभावित

गॅस्ट्रिक कॅन्सरचे सर्वात मोठे कारण म्हणजे खराब आहार आणि जीवनशैली. महिलांना गॅस्ट्रिक कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते कारण त्यांची जीवनशैली अतिशय व्यस्त असते, तसेच त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळाही पाळल्या जात नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, मिझोराममध्ये गॅस्ट्रिक कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

या कारणांमुळे होतो गॅस्ट्रिक कॅन्सर

– फळं, भाज्या कमी खाणे

– धूम्रपान करणे

– खूप खारट अन्नपदार्थ खाणे

– हायपर ॲसिडिटी आणि गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लेक्स डिसीज

संशोधन काय सांगते ?

गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने व्यक्तीला या समस्येपासून आराम मिळू शकतो. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चच्या अहवालानुसार, स्टार्चशिवाय अधिक भाज्या आणि फळे खाल्ल्यास गॅस्ट्रिक कर्करोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

या पदार्थांचे करा सेवन

पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ॲव्हकॅडो, पपईस भोपळा, रताळं, मका, अंड,, पालक अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. त्याशिवाय तुम्ही संत्रं, मिरची, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, बटाटा, सिमला मिरची, टोमॅटो हे व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खावेत, ज्यामुळे गॅस्ट्रिक कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो. व्हिटॅमिन सी व कॅरोटेनॉयड्स हे अँटी-ऑक्सीडेंटच्या स्वरूपात कार्य करतात, जे कॅन्सरच्या पेशींची वाढ कमी होते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!