AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनापासून मुक्तीसाठी केवळ लस एकमेव पर्याय आहे का?; वाचा तज्ज्ञांना काय वाटतं?

कोरोनामुळे संकटात सापडलेलं संपूर्ण जग त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोरोना लसीची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. (is vaccine the only option to get rid of coronavirus know what experts say)

कोरोनापासून मुक्तीसाठी केवळ लस एकमेव पर्याय आहे का?; वाचा तज्ज्ञांना काय वाटतं?
कोरोना लस प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Dec 14, 2020 | 2:59 PM
Share

नवी दिल्ली: कोरोनामुळे संकटात सापडलेलं संपूर्ण जग त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोरोना लसीची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. फायझर-बायोटेकच्या लसीमुळे कोरोनावर मात करता येईल, असं सर्वांनाच वाटत आहे. ब्रिटनमध्ये तर लसीकरणही सुरू झालं असून त्याचे साईड इफेक्ट्सही दिसून आले आहेत. दुसरीकडे भारतातही तीन कंपन्यांनी लसीकरणासाठी मंजुरी मागितली आहे. मात्र, कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी लस हा एकमेव पर्याय आहे का? हा प्रश्न अजूनही तसाच आहे. तज्ज्ञांना त्याबाबत काय वाटतं? त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप. (is vaccine the only option to get rid of coronavirus know what experts say)

लस शिवाय काहीच पर्याय नाही

कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी सध्या तरी संपूर्ण जग कोरोना लसीची वाट पाहत आहे. या लसी शिवाय ही महामारी दूर करण्यासाठी आणखी काही उपाय आहे का? यावर नवी दिल्लीच्या जी. बी. पंत रुग्णालयाचे डॉक्टर संजय पांडेय यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. कोणतीही लस तयार करण्यापूर्वी तीन गोष्टी पाहिल्या जातात. एक म्हणजे ती लस सुरक्षित आहे का? दुसरं म्हणजे लस किती परिणामकारक आहे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे लसीचा दीर्घकालीन परिणाम काय असतो? या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचं डॉ. पांडेय सांगतात.

सध्या जेवढ्याही लसींना मान्यता देण्यात आली आहे. त्या सुरुवातीच्या दोन कसोटींवर उतरल्या आहेत. मात्र, कोरोना हा एक वर्ष जुना व्हायरस आहे. त्यामुळे या लसींचे त्याबाबतचे दीर्घकालीन काय परिणाम आहेत हे अजून समजलेले नाहीत. त्यासाठी अनेक वर्षे डेटा एकत्र केला जातो. कारण आता कोरोना व्हॅक्सीनची अधिक वाट पाहणं शक्य नाही. त्यामुळेच तातडीने या व्हॅक्सीनला मंजुरी दिली जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

प्रत्येक व्हायरल आजारात मानसिक गुंतागुंत

या महामारीच्या काळात अनेक लोक मानसिक आजाराचे शिकार झाले आहेत. हा कोरोनाचा साईड इफेक्ट आहे का? असा सवाल डॉ. संजय पांडेय यांना करण्यात आला. त्यावर कोरोनाचा मानसिकतेवर परिणाम होतो, हे संशोधनातून पुढे आलं आहे. पण केवळ सुरुवातीलाच हा परिणाम होतो. संसर्ग झाल्यानंतर सुंघण्याची आणि चव घेण्याची क्षमता कमी होते. मानसिक परिणामामुळे असं होतं. केवळ कोरोना झाल्यानेच नाही तर कोणत्याही व्हायरल आजारामुळे मानसिकतेवर परिणाम होत असतो, असंही त्यांनी सांगितलं.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होताना दिसत आहे. पण त्यामुळे लोक निष्काळजीपणे वागत असल्याचं दिसून येत आहे. त्याचे भविष्यात मोठे परिणाम पाहायला मिळू शकतात. थंडीच्या काळात अनेक दिशात कोरोनाचा प्रकोप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. (is vaccine the only option to get rid of coronavirus know what experts say)

संबंधित बातम्या:

‘कोरोना’तून बरे झाल्यावर रुग्णांमध्ये हृदयासंबंधित समस्यांमध्ये वाढ, पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…

तुम्हाला अ‍ॅलर्जी आहे? तर मग कोरोना लसीवरची सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त; 14 दिवसात एकही रुग्ण आढळला नाही

(is vaccine the only option to get rid of coronavirus know what experts say)

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत