AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pomegranate : डाळिंब खाण्याचे फायदे आणि तोटे, जाणून घ्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे फळ?

डाळिंब हे अतिशय चविष्ट फळ आहे. त्याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. मात्र ते खाल्ल्याने काही तोटेही होऊ शकतात. जाणून घेऊ या डाळिंब खाण्याचा परिणाम.

Pomegranate : डाळिंब खाण्याचे फायदे आणि तोटे, जाणून घ्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे फळ?
डाळिंब खाण्याचे अनेक फायदे
| Updated on: Sep 07, 2022 | 3:13 PM
Share

An Apple a day, keeps the doctor Away! अशी एक म्हण आहे. सफरचंद खाल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. एक सफरचंद खाल्याने संपूर्ण दिवस उर्जा मिळते आणि आजारांपासून संरक्षण (Protection from diseases) होते. मात्र सफरचंदाशिवाय इतरही अनेक फळं आहेत, ज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक असते. फळांमध्ये अनेक पौष्टिक तत्व असतात. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांच्याशिवाय फळांमध्ये इतरही पौष्टिक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्या फळांमध्ये डाळिंबाचाही (Pomegranate) समावेश आहे. डाळिंब हे गोड आणि अतिशय चविष्ट फळ असून अनेक आजारांवरही ते गुणकारी आहे. अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. ते व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी (Vitamin C & B)चा उत्तम स्त्रोत आहे. डाळिंबामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक (जस्त) मोठ्या प्रमाणात असते. डाळिंबाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात .मात्र ते खाल्ल्याने काही तोटेही (Benefits and side effects) होऊ शकतात.

डाळिंब खाण्याचे फायदे :

पेशींना बळकटी मिळते – डाळिंबामध्ये अनेक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. डाळिंबाच्या रसात इतर फळांच्या रसापेक्षा अधिक अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्याचे सेवन केल्याने पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते. तसेच सूज कमी होते.

कॅन्सरपासून बचाव – डाळिंबाचा रस हा कॅन्सरग्रस्त लोकांसाठी फायदेशीर ठरतो. प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींना रोखण्यासाठी डाळिंबाचा रस प्यावा. तसेच त्यामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो.

अल्झायमरपासून बचाव – डाळिंबाचे दाणे अल्झायमर रोगाच्या वाढीला रोखतात. तसेच एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात.

पचन – डाळिंबाचा रस प्यायल्याने आतड्याची सूज कमी होते तसेच पचन सुधारते. मात्र डायरियाच्या रुग्णांना डाळिंबाचा रस न पिण्याचा सल्ला दिला जातो.

सांधेदुखी – डाळिंबाचा रस सांधेदुखी, वेदना आणि सूज कमी करण्यात फायदेशीर ठरतो.

हृदयविकार – हृदयविकाराची समस्या असल्यास, डाळिंबाचा रस पिणे लाभदायक ठरते. हृदय आणि धमन्या यांचे वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी डाळिंबाचा रस प्यायचा सल्ला दिला जातो.

ब्लडप्रेशर – ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी डाळिंबाचा रस फायदेशीर मानला जातो.

मधुमेह – मधुमेह म्हणजेच डायबिटीजच्या उपचारात डाळिंबाच्या रसाचे सेवन केले पाहिजे. डाळिंबाचा उपयोग इन्सुलिन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर कमी करण्यासाठी केला जातो.

डाळिंब खाण्याचे तोटे :

  • डाळिंबाचे साल, मूळ किंवा खोडाचा जास्त प्रमाणात वापर करणे असुरक्षित ठरते, कारण त्यामध्ये विष असू शकते.
  • कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी डाळिंबाच्या रसाचे सेवन कमी प्रमाणात करावे.
  • अतिसाराचा त्रास होत असेल तर डाळिंबाचा रस सेवन करू नये.
  • डाळिंबाचा रस त्वचेवर लावल्यास काही लोकांना खाज येणे, सूज येणे अथवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.