AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपण्यापूर्वी जिरे-ओवा पूड खाण्याचे तज्ज्ञांनी सांगितले ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रात्री झोपण्यापुर्वी तूम्ही जर कोमट पाण्यात जिरे पूड आणि ओव्याची पूड मिसळुन प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. या लेखाद्वारे आपण आयुर्वेदिक तज्ञांकडून जिरे आणि ओवा पावडरच्या आश्चर्यकारक फायद्यांबद्दल जाणून घेऊयात.

रात्री झोपण्यापूर्वी जिरे-ओवा पूड खाण्याचे तज्ज्ञांनी सांगितले 'हे' आश्चर्यकारक फायदे
jeera and ajwain powderImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 13, 2025 | 1:52 PM
Share

आपली बदलती जीवनशैली आणि रूटिंगमुळे आरोग्याची योग्य काळजी घेता येत नाही. त्यामुळे अनेकजण आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करत असतात. अशातच आपली पचनसंस्था अन्न पचवण्यात आणि दिवसभर शरीराला उत्साही ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक वेळा अपचन, गॅस, ॲसिडीटी आणि जडपणा यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत घरगुती उपाय सर्वात प्रभावी ठरू शकतात.

तुम्हाला जर अशा काही समस्या उद्भवत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी जिरे आणि ओव्याची पूड या दोघांचे मिश्रण पाण्यासोबत घेतल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि शरीर डिटॉक्स होते. हे केवळ पोटाच्या समस्या दूर करत नाही तर वजन कमी करण्यास, चयापचय वाढवण्यास आणि चांगली झोप घेण्यास मदत करते.

आयुर्वेदामध्ये, जिरे आणि ओवा हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानले गेले आहे, जे केवळ पचन प्रक्रिया व्यवस्थित ठेवत नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन केल्याने शरीराला आराम मिळतो आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

विशेषत: ज्यांना गॅस, बद्धकोष्ठता आणि जडपणाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे मिश्रण फायदेशीर आहे. तर या समस्यांवर मात करण्यासाठी आम्ही आयुर्वेदिक तज्ञ डॉ. किरण गुप्ता यांच्याकडून जाणून घेणार आहोत की रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत जिरे आणि ओवा पावडरचे मिश्रण खाल्ल्याने तुम्हाला आणखी कोणते फायदे मिळतील.

त्वचा होईल चमकदार

डॉ.किरण गुप्ता यांनी सांगितले की, जेव्हा तुमची पचनशक्ती चांगली असते तेव्हा त्वचा देखील चमकदार होते. यासाठी कोमट पाण्यात जिरे आणि ओवा पूड मिक्स करून प्यायल्याने तुमची त्वचा चमकदार होते. यामुळे शरीरातील घाण काढून तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. यामुळे मुरुम, पुरळ आणि चेहऱ्यावरील सूज यापासून देखील आराम मिळू शकतो. पण याच्या सेवनासोबतच तुम्हाला संतुलित आहारही घ्यावा लागेल. हे लक्षात ठेवा.

जळजळ कमी करते

ओवामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, यांच्या सेवनाने शरीरातील जळजळ कमी होते. यासोबतच जिरे हे अनेक गुणधर्मांचे भांडार आहे. एवढेच नाही तर या दोघांचे मिश्रण नियमितपणे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी बऱ्याच प्रमाणात नियंत्रित ठेवता येते.

शरीर डिटॉक्सिफाई करते

झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात ओवा आणि जिरे मिक्स करून प्यायल्याने शरीरातील घाण निघून जाते. शरीरातील अतिरिक्त पदार्थ काढून टाकण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. त्यामुळे याचे सेवन करून तुम्ही तुमचे शरीर डिटॉक्सिफाई करू शकता.

पाचक प्रणाली मजबूत करते

जिरे आणि ओवामध्ये पाचक एंझाइम्स उत्तेजित करणारे घटक असतात, जे पोटातील गॅस, अपचन आणि ऍसिडिटीपासून आराम देतात. या मिश्रणामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पोट हलके वाटते. याशिवाय हे मिश्रण चयापचय गतिमान करते आणि शरीरात जमा झालेले अतिरिक्त फॅट कमी करण्यास मदत करते.

गॅस आणि गोळा येणे पासून आराम

जर तुम्हाला खाल्ल्यानंतर पोटात जडपणा जाणवत असेल किंवा वारंवार गॅसचा त्रास होत असेल तर जिरे आणि ओव्याची पूड याचे मिश्रण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. ओव्यांमध्ये गॅस कमी करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे पोटाला आरामदायी वाटते.

जिरे आणि ओवा पूडचे सेवन कसे करावे?

जिरे आणि ओव्याची पूड या दोघांचे सेवन करण्यासाठी प्रथम जिरे आणि ओवा समान प्रमाणात घ्या. हलकेच कढईत भाजून घ्या. यानंतर मिक्सरच्या साहाय्याने जिरे आणि ओवा या दोघांची बारीक पूड करा. आता ही पावडर अर्धा चमचा घ्या आणि झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत खा. यामुळे तुमच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. तसेच तुम्ही जर कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असाल तर कृपया त्याचे सेवन सुरू करण्यापूर्वी एकदा तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.