AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वॉक केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायला हवे,अनेक लोकांना माहिती नाही

जेव्हा आपण चालत असतो किंवा कोणताही व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान वाढलेले असते आणि आपल्याला घाम येत असतो. या दरम्यान आपले रक्ताभिसरण वाढते आणि शरीर थंड होण्यास थोडा वेळ लागतो.

वॉक केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायला हवे,अनेक लोकांना माहिती नाही
driking water in morning walk
| Updated on: Jul 15, 2025 | 9:32 PM
Share

मॉर्निंग वॉक वा कोणतीही एक्सरसाईज केल्यानंतर अनेक लोकांना लागलीच तहान लागते. त्यावेळी अनेक लोक लागलीच कोणताही विचार न करता पाणी घटाघट पित असतात. परंतू तुम्हाला माहिती आहे का ? वॉक केल्यानंतर लागलीच पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे की नाही ? बहुतांशी वेळा यापासून अनेक लोक अनभिज्ञ असतात. चालून झाल्यानंतर पाणी प्यायची एक वेळ आणि पद्धत असते.

वॉकींग झाल्यानंतर लागलीच पाणी प्यावे ?

जेव्हा आपण वॉक किंवा कोणताही व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान वाढते आणि आपल्याला गरम होऊन घाम येऊ लागतो. अशा वेळी आपले ब्लडप्रेशर वाढलेले असते आणि शरीरास सामान्य तापमानास यायला थोडा वेळ लागतो. जर तुम्ही लागलीच पाणी प्यायला तर अनेक अडचणी येऊ शकतात. चला तर वाचूयात काय नेमक्या अडचणी येतात.

सर्दी किंवा खोकला येऊ शकतो : जर शरीराचे तापमान वाढलेले असेल आणि तुम्ही पाणी प्याला तर अचानक शरीर थंड होऊन सर्दी खोकला होऊ शकतो.

पोटात दुखु शकते : तहान प्रचंड लागली असताना अचानक पाणी प्यायल्याने पोटात दुखू शकते किंवा चमक मारु शकते.

पचनावर परिणाम होतो : लागलीच पाणी प्यायल्याने पचन प्रक्रीया रोखू शकते. त्यामुळे अपचन होऊ शकते.

वॉक केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे ?

तज्ज्ञांच्या माहीतीनुसार चालणे थांबवल्यानंतर किमान २० ते ३० मिनिटांनी पाणी प्यायला हवे. या दरम्यान, तुम्ही काही वेळ बसून हलके स्ट्रेचिंग करुन तुमच्या शरीराला कूल डाऊन करु शकता. जेव्हा तुमचा पल्स रेट नॉर्मल होईल तेव्हा घाम येणे बंद होईल.तेव्हा तुम्ही पाणी पिणे योग्य होईल.

फॉलो करा या टिप्स –

हळूहळू प्या : एक साथ जास्त पाणी पिण्याऐवजी हळू हळू एक – एक घोट पाणी प्या

रूम टेंपरेचर पाणी : थंड पाणी पिऊ नये, हलके कोमट पाणी पिणे केव्हाही चांगले

हायड्रेटेड रहा: केवळ चालतानाच नव्हे तर संपूर्ण दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्या, बॉडी डायड्रेटेड ठेवा. खुपच घाम येत असेल तर साध्या पाण्या ऐवजी नारळ वा लिंबू पाणी पिऊ शकता.

योग्य वेळी आणि पद्धतीने पाणी प्यायल्याने बॉडी रिकव्हर होण्यास मदत होते. आणि आरोग्याचे लाभ मिळतात. तेव्हा यापुढे वॉक करताना कधीही तहान लागली तर थोडे थांबन रिलॅक्स झाल्यानंतर सावकाश पाणी प्या…

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....