AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लो-कॅलरी, व्हिटॅमिनयुक्त असतात तिळाचे लाडू, खाल्याने हे 5 आजार होतील दूर

हिवाळ्याच्या दिवसात तिळाचे लाडू खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तीळ, गूळ आणि शेंगदाण्यांपासून बनणारे हे लाडू खूप पौष्टिकही असतात.

लो-कॅलरी, व्हिटॅमिनयुक्त असतात तिळाचे लाडू, खाल्याने हे 5 आजार होतील दूर
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 14, 2023 | 5:27 PM
Share

नवी दिल्ली – मकर संक्रांत (makar sankranti) आणि लोहरी सारख्या सणांदरम्यान खाण्या-पिण्याची खूप रेलचेल असते. आजही, भारतातील बहुतांश घरांमध्ये, लोक सणासुदीच्या काळात पारंपारिक पद्धतीने तिळगूळ (til laddu), खिचडी व इतर पदार्थ बनवून खातात. हिवाळ्याच्या दिवसात तिळाचे लाडू खाणे आपल्या आरोग्यासाठी (benifits of eating til ladu) खूप फायदेशीर असते. हे लाडू अतिशय आरोग्यदायी असून त्यात अनेक जीवनसत्वं असतात.

तीळ आणि गूळ घालून तयार केलेले लाडू हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्याचे काम करतात. शरीराला बरे करण्यासोबतच तिळापासून शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या हिवाळ्यात तीळ खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या.

तिळाच्या लाडवामध्ये अनेक पोषक तत्वं

तिळात लोह, प्रथिने, व्हिटॅमिन बी आणि ई आढळतात. हे सर्व घटक डोळे, यकृत आणि इतर अवयवांसाठी फायदेशीर आहेत. तुम्ही काळ्या किंवा पांढर्‍या तिळाचे लाडू तयार करू शकता. तीळ हे हेल्दी सुपरफूड आहे आणि या कारणास्तव त्याचे तेलही सेवन करता येते. तिळगुळामध्ये वापरण्यात येणाऱ्या गुळामुळे आपले रक्ताभिसरण सुधारते. हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, गुळामुळे त्या प्रसरण पावतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. हे लो कॅलरी फूड असल्याने वजन कमी करणारे लोकही त्याचे सेवन करू शकतात.

तिळगूळाच्या सेवनाने हे 5 आजार राहतील दूर

1) हिवाळ्यात तिळाचे लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो कारण ते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच खोकला आणि सर्दीपासून सुरक्षित ठेवतात.

2) या लाडवांमध्ये कॅल्शिअम असल्यामुळे हाडं मजबूत होतात व हाडांच्या दुखण्याचा त्रास होत नाही.

3) बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या लोकांनी हिवाळ्यात तिळाचे लाडू जरूर खावे, कारण त्यात फायबरदेखील असते.

4) तिळाचे लाडू हे ऊर्जा देण्यासाठी प्रभावी आहे. तसेच दम्याच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहेत.

5) हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक येतो. अशा परिस्थितीत तिळाचे सेवन केले पाहिजे कारण त्यातील घटक आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवतात.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...