AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान.. उन्हाळ्यात चुकूनही पिऊ नका गारेगार पाणी, अन्यथा शरीराला या आजारांचा धोका

Cold Water Disadvantages: थंड पाणी तुमच्या आरोग्याला किती हानी पोहोचवू शकते, हे तुम्हाला माहित आहे का ? थंड पाणी प्यायल्याने आराम मिळत असला तरी ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

सावधान.. उन्हाळ्यात चुकूनही पिऊ नका गारेगार पाणी, अन्यथा शरीराला या आजारांचा धोका
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 17, 2023 | 4:32 PM
Share

नवी दिल्ली : रणरणता उन्हाळा (hot summer) सुरू झाला आहे. उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे आणि भीषण गरमी यामुळे आपणा सर्वांच्याच अंगातून भरपूर घाम येतो आणि घसा कोरडा पडू लागतो. आपल्या शरीरातील पाणी कमी होऊ लागते व त्यामुळे आपल्याला वारंवार तहान (feeling thirsty) लागते. तहान शमवण्यासाठी बहुतेक लोक उन्हाळ्यात थंड पाणी (cold water) किंवा एखादे थंड पेय पिणे पसंत करतात. कारण त्यामुळे गारेगार वाटतेच आणि शमवतेच, पण उष्णतेपासून काही प्रमाणात आरामही मिळतो.

जेव्हा गरमी वाढते, तेव्हा त्यापासून वाचण्यासाठी बरेचदा लोकंही थंड पाणी पितात. पण थंड पाणी तुमच्या आरोग्याला किती हानी पोहोचवू शकते, हे तुम्हाला माहित आहे का ? थंड पाणी प्यायल्याने आराम मिळत असला तरी ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते ते जाणून घेऊया.

थंड पाणी प्यायल्याने उद्भवू शकतात शकतात या समस्या –

  1. थंड पाणी प्यायल्याने हृदयाच्या ठोक्यांच्या गतीवर परिणाम होतो. हे पाणी शरीराच्या मज्जासंस्थेचे संतुलन बिघडवण्याचे काम करू शकते.
  2. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. अशा परिस्थितीत अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास लठ्ठपणा अधिक वेगाने वाढू शकतो. यामुळेच अनेक आहारतज्ञ जेवल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे टाळण्याचा सल्ला देतात.
  3. बाहेरच्या कडक उन्हातून घरी आल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास सर्दी, खोकला, सर्दी अशा समस्या होऊ शकतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर सामान्य पाणी प्या. वास्तविक, थंड पाण्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात श्लेष्मा निर्माण होऊ लागतो, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो.
  4. फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने मोठे आतडे आकुंचन पावू शकते. त्यामुळे सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. बद्धकोष्ठता हा अनेक आजारांशी जोडला गेला आहे, ज्याच्या भविष्यात आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
  5. खूप थंड पाणी प्यायल्याने शरीरातील पेशीही आकसतात आणि त्यांचे काम नीट करू शकत नाहीत. त्याचा चयापचय आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
  6. थंड पाणी प्यायल्याने तुमचा घसाही खराब होऊ शकतो. तसेच पचनाशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. हे उपाय अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. )

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.