AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलर्ट | राज्यातले 2 मृत्यू H3N2 मुळेच झाले का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची महत्त्वाची माहिती

राज्यात एकिकडे कोव्हिडच्या रुग्णांमध्ये नव्याने वाढ होत आहे तर H3N2 संसर्ग झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावरून महत्त्वाची माहिती दिली.

अलर्ट | राज्यातले 2 मृत्यू H3N2 मुळेच झाले का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची महत्त्वाची माहिती
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 15, 2023 | 2:35 PM
Share

मुंबई | राज्यात अहमदनगर (Ahmednagar) आणि नागपूर (Nagpur) या दोन शहरात झालेल्या दोन मृत्यूंमुळे आरोग्य यंत्रणांची अक्षरशः झोप उडाली आहे. नव्या H3N2 विषाणूमुळे हे मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय. हे दोन बाधित ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले, त्यांना ट्रेस करून त्यांची कोरोना चाचणी करण्याचं आव्हान यंत्रणेसमोर आहे. त्यातच नव्या H3N2 विषाणूमुळे आणखी काय धोका असू शकतो, असे प्रश्न राज्याच्या जनतेला पडले आहेत. नगर आणि नागपूरमध्ये झालेल्या दोन मृत्यूंमागे H3N2 इन्फ्लुएंझा हेच कारण होतं का, यावरूनही तर्क-वितर्क लावले जात आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी यावर सविस्तर उत्तर दिलंय. या दोन्ही रुग्णांना H3N2 ची बाधा होतीच. मात्र त्यासोबतच कोविड 19 आणि इतर आजारदेखील त्यांच्या मृत्यूसाठी कारण ठरल्याचं प्राथमिक अहवालात समोर आलंय. यासंदर्भातील सविस्तर अहवाल अजून येणं बाकी आहे. त्यानंतरच डिटेल्स देता येतील असं आरोग्यमंत्री सावंत म्हणाले.

नगरच्या रुग्णाला कशी झाली बाधा?

अहमदनगरमधील रुग्णाला H3N2 ची बाधा कशी झाली, यावरून तानाजी सावंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, अहमदनगर डॉ. विठ्ठलराव पाटील फाऊंडेशन मेडिकल कॉलेज येथील चंद्रकांत सपकाळ या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हा विद्यार्थी त्याची परीक्षा संपल्यानंतर अलिबागला फिरायला आलेला होता. तो कँपसला परतल्यानंतर त्याला ताप आणि अंगदुखी होती. विद्यार्थ्यांनी अॅडमिट करायचा सल्ला दिला. आई-वडील दुसऱ्या दिवशी आले. दुसऱ्या दिवशी त्याला अॅडमिट केलं गेलं. 12 मार्चला त्यानंतर त्याला खासगी हॉस्पिटलला शिफ्ट केलं गेलं. साईदीप खासगी रुग्णालयात 13 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याला H3N2, कोव्हिड 19 आणि मेट्रोपॉलिस अशा अनेक आजारांमुळे मृत्यू झाला.

नागपूरचा मृत्यू कसा?

नागपूरमधील 72 वर्षांचे ए के माझी यांचा मृत्यू झाला. त्यांनाही वय आणि इतर गुंतागुंतीमुले मृत्यू झाला. 9 मार्च रोजी यांचा मृत्यू झाला.  या दोघांचाही मृत्यू H3N2 मुळेच झाला असं सध्या तरी म्हणता येणार नाही, मात्र H3N2 आणि कोविड तसेच इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचं दिसून येतंय.H3N2 हा मृत्यूपर्यंत नेणारा आजार नाही, असा प्राथमिक अहवाल आहे.

मात्र वाढत्या कोविड रुग्णांमुळे राज्यातील यंत्रणांना अलर्ट घोषित करण्यात आलंय. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत २४ तास सेवा उपलब्ध राहिल, असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय. अनेक केंद्रांमध्ये टॅमी प्लू गोळ्यांचा साठा उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णांना त्या देण्यात येतील, असेही सावंत यांनी सांगितले आहे.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच